पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडी हद्दीतील विविध मार्गांवर प्रवासी सेवा पुरवली जाते. गणेशोत्सवात भाविकांना सार्वजनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बस संचलन करण्यात आले होते. उत्सवाच्या सुरुवातीच्या चार दिवसांत अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या तसेच उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसांत बस सेवा पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी राहिला.
advertisement
मागील वर्षीच्या तुलनेत पीएमपी प्रवाशांची संख्या काही दिवस 13 लाखांपर्यंत पोहोचली होती. यंदा गणेशोत्सवात एकूण 1 कोटी 8 लाख प्रवाशांनी पीएमपीतून प्रवास केला, तर मागील वर्षी एकूण प्रवासी संख्या 1 कोटी 28 लाख होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही, बसांची संख्या यंदा मार्गावर जास्त होती, परंतु प्रवासी संख्या कमी राहिली.
तिकीट दरवाढीमुळे पीएमपीचे उत्पन्न मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदा गणेशोत्सवात पीएमपीला 21 कोटी रुपये उत्पन्न झाले, तर मागील वर्षी हे उत्पन्न 17 कोटी 43 लाख रुपये होते. दरवाढ झालेल्या तिकीट दरांमुळे उत्पन्नात साधारण 4 कोटी 50 लाख रुपये वाढ झाल्याचे दिसून आले.
पीएमपीचे अधिकारी प्रवासी संख्या कमी झाल्याबाबत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. तिकीट दरवाढीमुळे प्रवासी संख्या घटत असली तरी, महसूल वृद्धीमुळे महामंडळाचे आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. आगामी काळात प्रवासी आकर्षित करण्यासाठी नवीन योजना आणि सुविधा आणण्याचा मानस पीएमपीकडे असल्याचेही समजते. या वर्षी गणेशोत्सवात प्रवासी कमी झाले असले तरी, महामंडळाने मिळवलेले उत्पन्न हा एक सकारात्मक संकेत आहे, ज्यामुळे भविष्यात सेवा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक योजना राबवता येऊ शकतात.