TRENDING:

Pune News : वडगाव परिसरात वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिक त्रस्त, दैनंदिन प्रवास करणे कठिण

Last Updated:

Vadgaon Traffic News : वडगाव परिसरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे नागरिकांना दररोज दैनंदिन प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : वडगाव शहरात दर गुरुवारी भरवल्या जाणाऱ्या आठवडी बाजारामुळे तसेच इतर दिवशीही बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर रांगा लागल्यामुळे वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था विस्कळीत होते. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने यांसारखी आपत्कालीन वाहने अडकण्याचा धोका निर्माण होतो. ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रशासन आणि वडगाव पोलिस ठाण्याने संयुक्त नियोजन करून कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
News18
News18
advertisement

वडगाव हे तालुक्याचे प्रमुख केंद्र असल्याने येथे जिल्हा आणि सत्र न्यायालय, महसूल, आरोग्य, कृषी यांसारखी महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर गावांमधून दररोज हजारो नागरिक येथे कामानिमित्त ये-जा करतात. त्यामुळे शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. गुरुवारच्या आठवडी बाजारात शेतकरी, भाजीपाला विक्रेते तसेच फळ विक्रेते मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या करून थेट दुकानं लावतात. परिणामी रस्त्यावरील जागा व्यापली जाते आणि वाहनांची वाहतूक ठप्प होते.

advertisement

नागरिकांचा ठाम आग्रह आहे की, मुख्य रस्त्याच्या केवळ एका बाजूवरच दुकाने लावण्याची सक्ती केली तर परिस्थिती नियंत्रणात येईल. यामुळे खरेदीस आलेल्या लोकांना सोय होईल, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार नाही. आपत्कालीन सेवा वाहनांना मोकळा मार्ग मिळेल.

याशिवाय, बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलिसांची विशेष नेमणूक करावी, जेणेकरून गाड्यांची रांग आटोक्यात राहील. अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा दिल्यास परिस्थिती सुधारेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करतात.

advertisement

गर्दीमुळे अनेक ग्राहक खरेदीस टाळाटाळ करतात. परिणामी व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, योग्य नियोजन केल्यास खरेदीदार अधिक संख्येने बाजारात येतील आणि व्यापारालाही चालना मिळेल. त्यामुळे वाहतूक नियोजन, दुकाने मांडणी आणि पार्किंग नियंत्रण या सर्व गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी करणे तातडीने आवश्यक झाले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : वडगाव परिसरात वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिक त्रस्त, दैनंदिन प्रवास करणे कठिण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल