सूरज सांगतो, वारी ही एक पवित्र यात्रा आहे. संत सेना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी देखील माझ्या कलेद्वारे सेवा देत आहे. इतर जण जसे आपापल्या परीने योगदान देतात, तसेच मी हेअर कटिंगच्या माध्यमातून सेवा देतो. यामागे कोणताही आर्थिक हेतू नाही. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आणि 'राम कृष्ण हरी' असं त्यांच्या तोंडून ऐकून खूप आनंद मिळतो.
advertisement
Ashadhi Wari 2025: पंढरीची वारीच का? कोल्हापूरच्या वारकऱ्याचे बोल लय भारी, तुम्हीही म्हणाल जय हरी!
सूरज मूळचा कोल्हापूरचा असून गेली आठ वर्षे तो पुण्यात वास्तव्यास आहे. तो जेण्ट्स आणि लेडीज दोघांसाठीही वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कट आणि ट्रीटमेंट सेवा देतो. पण वारीच्या काळात, तो आपले दैनंदिन काम थांबवून फक्त वारकऱ्यांची सेवा करतो. गेल्या दोन वर्षांपासून तो ही सेवा सुरू ठेवतोय.
वारकरी महिनाभर चालत असतात, अनेक वेळा त्यांना केस किंवा दाढी करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा कमी करण्यासाठी ही सेवा मदतीची ठरते. पुण्य मिळवण्याचा हा एक मार्ग आहे, असं मला वाटतं, असं सूरजने सांगितलं. वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असं मानणाऱ्या सूरज बनकर याच्या या सेवेला अनेकांकडून प्रशंसा मिळत आहे.