TRENDING:

Ekadashi Vrat Katha: इंदिरा एकादशीला वाचतात ही व्रत कथा! पूर्वजांना मिळेल मोक्ष, पहा मुहूर्त-तिथी

Last Updated:

Ekadashi Vrat Katha: पौराणिक कथेनुसार, जो व्यक्ती इंदिरा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूची पूजा करतो, त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. मृत्यूनंतर त्यांना स्वर्गातही स्थान मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शनिवारी 28 सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रत केले जाते. पौराणिक कथेनुसार, जो व्यक्ती इंदिरा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूची पूजा करतो, त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. मृत्यूनंतर त्यांना स्वर्गातही स्थान मिळते. पितरांना संतुष्ट करून मोक्ष मिळवायचा असेल तर इंदिरा एकादशीचे व्रत विधीनुसार करावे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पूजेच्या वेळी इंदिरा एकादशीची व्रत कथा अवश्य वाचावी. यामुळे व्रत पूर्ण होईल आणि पुण्यही प्राप्त होईल. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठातील ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून इंदिरा एकादशी व्रताची कथा जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

इंदिरा एकादशी व्रताची कथा - सत्ययुगात इंद्रसेन नावाचा राजा महिष्मती नगरावर राज्य करत होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा नारदजी म्हणाले की, मी एके दिवशी यमलोकात गेलो होतो. तेथे यमराजांना भेटलो, त्यांचे कौतुक केले. त्यादरम्यान मी तुझ्या वडिलांना पाहिले. ते यमलोकात होते.

advertisement

नारदजींनी आपल्या वडिलांचा संदेश राजा इंद्रसेनला सांगितला. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, काही कारणास्तव त्यांच्या एकादशी व्रतामध्ये काही अडथळे येत होते, त्यामुळे त्यांना यमलोकात यमराजांसोबत वेळ घालवावा लागतोय. तुमच्याकडून शक्य असेल तर वडिलांसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करा. याने ते यमलोकातून मुक्त होऊन स्वर्गात स्थान मिळवू शकतील. तेव्हा राजा इद्रसेनने नारदांना इंदिरा एकादशी व्रताची पद्धत सांगण्यास सांगितले.

advertisement

शुक्रवार अनपेक्षित सुखावणारा! या जन्मतारखा असणाऱ्यांना मिळणार डबल सरप्राईज

नारदजी म्हणाले की, इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी स्नान वगैरे करून भगवान शालिग्रामसमोर पितरांचे श्राद्ध करा. ब्राह्मणांना फळे आणि अन्न अर्पण करा नंतर त्यांना दक्षिणा द्या. त्यानंतर उरलेले अन्न गायीला खाऊ घाला. त्यानंतर धूप, दिवा, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादींनी भगवान ऋषिकेशची पूजा करावी. नंतर रात्री भागवत जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. यानंतर स्वतः भोजन करून व्रत पूर्ण करा. नारदजी म्हणाले की हे राजन! जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले तर तुमच्या वडिलांना नक्कीच स्वर्गात स्थान मिळेल. यानंतर नारदजी तेथून निघून गेले.

advertisement

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आल्यावर राजा इंद्रसेनने इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे त्यांचे वडील यमलोकातून मुक्त होऊन विष्णुलोकात गेले. मृत्यूनंतर राजा इंद्रसेनलाही स्वर्ग मिळाला.

पैसा येणार, नशीब उजळणार! ग्रहांचा राजा सूर्य या राशींचे आयुष्य पालटणार, भाग्योदय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ekadashi Vrat Katha: इंदिरा एकादशीला वाचतात ही व्रत कथा! पूर्वजांना मिळेल मोक्ष, पहा मुहूर्त-तिथी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल