नेमकं प्रकरण काय?
रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी आणलेल्या यो-यो टेस्टला आता पूर्णविराम लागला असून त्याच्या जागी ब्रॉन्को टेस्ट घेण्यात येणार आहे. अशातच आता ब्रॉन्को टेस्टवर माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून गौतम गंभीरवर टीका देखील केली आहे.
काय म्हणाला मनोज तिवारी?
advertisement
2027 च्या वर्ल्ड कप प्लानिंगमधून विराटला बाहेर करणं खूप कठीण जाईल, पण मला शंका आहे की रोहित शर्माला टीममध्ये ठेवलं जाईल. मी भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ब्रॉन्को टेस्ट ही रोहित शर्मासारख्या खेळाडूंसाठी आणली गेली आहे, असा आरोप मनोज तिवारीने केला आहे.
यो-यो टेस्ट बंद
गंभीर, सेहवाग, युवराज आणि इतर दिग्गज खेळाडू खूप चांगली कामगिरी करत होते, पण 2011 साली टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर यो-यो टेस्ट आणण्यात आली, आता ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्यात येणार आहे, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.
दरम्यान, गौतम गंभीर मागच्या वर्षी जुलै महिन्यात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला. तर आता एड्रियन ले रॉक्स टीम इंडियाचे स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच झाले आहेत. एड्रियन टीममध्ये आल्यानंतर त्यांनी ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्याचा आग्रह धरला.