वैभव सूर्यवंशीचा धमाका
वैभव सूर्यवंशीने या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली. दोन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये वैभवने 133 रन केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश होता. वैभवच्या या खेळीमुळे टीम इंडियाला मजबूत सुरूवात मिळाली, जी विजयासाठी महत्त्वाची ठरली. कर्णधार आयुष म्हात्रेची रणनीती आणि भारताच्या घातक बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियन टीमने गुडघे टेकले.
वनडे-टेस्टमध्ये कांगारूंची धुलाई
advertisement
टीम इंडियाने फक्त टेस्टच नाही तर वनडे सीरिजमध्येही ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. 3 मॅचची युथ वनडे सीरिज भारताने 3-0 ने जिंकली. सीरिजचा पहिला सामना भारताने 7 विकेटने, त्यानंतर दुसरा सामना 51 रननी आणि तिसरा सामना 167 रननी जिंकला. यानंतर टेस्ट सीरिजमध्येही भारताचं वर्चस्व कायम राहिले. टीमने पहिली युथ टेस्ट इनिंग आणि 58 रननी तर दुसरी टेस्ट 7 विकेट्सनी जिंकली.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग कोलमडली
दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची बॅटिंग पूर्णपणे कोलमडली. पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा फक्त 135 रनवर ऑलआऊट झाला, ज्यात विकेटकीपर ऍलेक्स ली यंगने 66 रन केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांचा 116 रनवर ऑलआऊट झाला, ज्यामुळे भारताला विजयासाठी फक्त 81 रनची गरज होती. भारताने हे आव्हान 3 विकेट गमावून पार केलं.
1995 चा विक्रम मोडला
या विजयासह भारताने वेस्ट इंडिजचा 1995 सालचा विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडिजने फैसलाबादमध्ये पाकिस्तानचा 992 बॉलमध्ये पराभव केला होता. भारताने आता फक्त 886 बॉलमध्ये युथ टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला आहे.