
मुंबई : मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात पुस्तकांच्या सान्निध्यात शांत बसायला जागा शोधणं आजही अनेकांसाठी आव्हानच असतं. पण रुपारेल कॉलेजच्या शेजारी अवघ्या 24 वर्षांच्या नितीन राकेश नाई तरुणाने सुरू केलेले बुक कॅफे हे त्या सर्वांसाठी एक अनोखं आणि आकर्षक ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे इथे 100–200 नव्हे तर तब्बल 4 हजारांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Last Updated: November 15, 2025, 15:34 ISTकोल्हापूर : आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमधील बऱ्याचशा अशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या आरोग्याची खास काळजी घेत. अशाच काही मसाल्यांपैकी एक मसाला म्हणजे कर्णफुल. या कर्णफुल मसाल्याची चक्रफुल, स्टार बडीशेप अशी अनेक नावे आहेत. कर्णफुल हा खड्या मसाल्याचा एक प्रकार असून हे एक प्रकारचे फळ आहे. मात्र याचे शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. याचबाबत कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 15, 2025, 18:57 ISTअमरावती : त्वचा म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा असते. आपल्याला जर एखादी आरोग्याची समस्या असेल, तर त्याचे परिणाम त्वचेवर दिसतात. प्रत्येक ऋतूमध्ये आपली त्वचा वेगळी दिसते. हिवाळ्यात आपल्या खानपानात अनेक बदल होतात. तसेच वातावरणात देखील बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होणे, बारीक पुरळ येणे, खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी अनेकजण मेडिकलमधील प्रॉडक्ट वापरतात. पण, आपला त्वचा प्रकार ओळखूनच प्रॉडक्ट घेणे महत्त्वाचे आहे. कोणतेही प्रॉडक्ट वापरल्यास आपल्या त्वचेला हानी होऊ शकते. त्यासाठी आपला त्वचा प्रकार ओळखणे गरजेचे आहे. त्वचा प्रकार कसा ओळखावा? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 15, 2025, 18:26 ISTपुणे: हिवाळा सुरू झाला असून सर्वत्र गारठा वाढला आहे. वातावरणाच्या बदलामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. या काळात आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास आपल्याला आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात देखील बदल करणं गरजेचं असतं. या काळात आपला आहार कसा असावा? याबाबत डॉ. शर्वरी इनामदार यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे
Last Updated: November 15, 2025, 17:53 ISTछत्रपती संभाजीनगर: मराठवाडा म्हणजे दुष्काळ आणि कोरडे हवामान, अशा प्रतिमेमुळे इथे केशर शेतीची कल्पनाही करणे कठीण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या येथील सीए प्रिया अग्रवाल यांनी या अशक्य वाटणाऱ्या संकल्पनेलाच आकार देत एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. जवळपास वर्षभर सातत्याने माहिती गोळा करून, अभ्यास करून आणि विविध तांत्रिक उपाय आजमावत त्यांनी आपल्या घरातील एका छोट्याशा खोलीत केशराची लागवड उभी केली आणि तब्बल 35 ग्रॅम शुद्ध केशरचे उत्पादन घेतले. आता या उपक्रमाला व्यावसायिक रूप देण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे प्रिया अग्रवाल यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: November 15, 2025, 16:25 ISTबीड : हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच रब्बी पिकांची लागवड ग्रामीण भागात जोर धरते. गहू, हरभरा, ज्वारी, मटार, मोहरी अशा पिकांचे उत्पादन या हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, तापमानातील अचानक घट, दवबिंदूंची वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे अनेकदा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
Last Updated: November 15, 2025, 16:07 IST