पुणे: आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना, जागरण, गरबा आणि दांडिया अशा अनेक कार्यक्रमांतून भक्तांचा उत्साह दिसून येतो. पण या उत्सवाच्या आनंदात काही दुर्दैवी घटना देखील घडतात. दरवर्षी आपण ऐकतो की गरबा किंवा नृत्य करत असताना एखाद्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो खरंच गरबा किंवा डान्स केल्याने हार्ट अटॅक येतो का?या काळात आपण नकळत कोणत्या चुका करतो ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो? याबाबत डॉ.संजीव जाधव यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.