
पुणे : उन्हाळ्यात आपल्याला तहान अधिक लागते आणि साहजिकच आपण अधिक पाणी पित असतो. मात्र हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. अर्थातच असे करू नये कारण आपल्या शरीरासाठी हायड्रेट राहणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, पिण्याचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि हानिकारक पदार्थ शरीरातून निघून जातात. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कमी पाणी पिण्याने मेंदूचेही नुकसान होऊ शकते. याबद्दलची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
Last Updated: November 23, 2025, 13:54 ISTपुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुणेकर खवय्ये असल्याने त्यांचे आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. ते म्हणतात की पुणे तिथे काय उणे त्याच म्हणे प्रमाणे इथल्या गोष्टी ही तशा वेगळ्याच असतात.
Last Updated: November 23, 2025, 17:56 ISTकोल्हापूर : कॅन्सरवरील एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून किमोथेरपीकडे पाहिले जाते. मात्र या किमोथेरपीमुळे होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुष्परिणामांमुळे बरेच रुग्ण किमोथेरपी करण्यास घाबरत असतात. मात्र हे दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. या किमोथेरपीमुळे रुग्णांना कॅन्सर विरोधात लढण्यास मदतच होत असते. याच किमोथेरपीबाबत सर्व आवश्यक माहिती कोल्हापूरच्या डॉ. रेश्मा पवार यांनी दिली असून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या त्या संचालिका आहेत
Last Updated: November 23, 2025, 17:31 ISTसातारा: क्षयरोग अर्थात टीबी हे नुसते नाव ऐकले तरी आजही मनात धडकी भरते. याला कारणही तसेच आहे. क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. क्षयरोग उपचार करण्यायोग्य आहे. तरी देखील योग्य काळजी न घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Last Updated: November 23, 2025, 17:05 ISTपुणे: डोक्यावर मोरपिसांचा टोप, अंगरखा, गळ्यात माळ, हातात टाळ, पायात चाळ असं सगळं असलेलं वासुदेवाचं रूप आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आजही अंगणात वासुदेव आला ही भाग्याची गोष्ट आहे, अशी समजूत आहे. ‘चांगुणाच्या घरी शंकर आले भोजनाला’, ‘स्वस्थ बसा स्वामी मन करूनी धीर..’ अशा गाण्यांमधून देवादिकांच्या कथा या दारात येणारे वासुदेव सांगतात. आधुनिकतेच्या युगात वासुदेवाची गाणी कमी झाली. महाराष्ट्रातल्या लुप्त होत चालेल्या या संस्कृतीविषयी आपण माहिती घेणार आहोत.
Last Updated: November 23, 2025, 16:45 ISTमुंबई : सकाळी मुलांच्या डब्यात द्यायला असो किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला असो क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल हा नेहमीच एक बेस्ट पर्याय आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि जास्त चव म्हणूनच घराघरांत ही रेसिपी पटकन हिट होते. साध्या बटाट्यांपासून तयार होणारा हा छोटासा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. चहासोबत काहीतरी झटपट पण चवदार खायचं असेल तर ही रेसिपी अगदी बेस्ट आहे.
Last Updated: November 23, 2025, 15:59 IST