हे ही वाचा : Black Friday सेलसाठी Appleची ऑफर्सची घोषणा! पाहा कशावर किती डिस्काउंट
हा कॉल कोलकाता आणि नवी दिल्ली या दोन शहरांदरम्यान करण्यात आला. 1995 साली मोबाईल फोन हा श्रीमंतीचा भाग मानला जायचा. तेव्हा एका मिनिटाचा कॉल करण्याचा खर्च 8.40 रुपये होता आणि इनकमिंग व आउटगोइंग दोन्ही कॉलसाठी शुल्क आकारले जायचे. जर एखाद्याने पीक तासांमध्ये कॉल केला तर त्याचा खर्च दुप्पट म्हणजे 16.80 रुपये प्रति मिनिट इतका होत असे.
advertisement
गेल्या काही वर्षांत भारतातील मोबाईल कम्युनिकेशन क्षेत्रात अभूतपूर्व बदल झाले आहेत. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारी प्रगती आणि बाजारातील तीव्र स्पर्धेमुळे मोबाईल सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे. 2016 हे वर्ष टेलिकॉम क्षेत्रासाठी मोठं वळण ठरलं. जिओने स्वस्त डेटा प्लॅन आणून या क्षेत्रात क्रांती घडवली आणि मोबाईल सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली.
हे ही वाचा : मुंबईत दाबेली खावी तर इथंच! तब्बल 20 हून अधिक प्रकार, तुम्ही ट्राय केलेत का?
1995 मध्ये झालेल्या पहिल्या कॉलपासून आजपर्यंत भारताच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी क्षेत्राने मोठी मजल मारली आहे. आज मोबाईल फोन आपल्याला सहजतेने व स्वस्त दरात जलद सेवा देत आहेत. या बदलांमुळे फक्त तंत्रज्ञानातील प्रगतीच नव्हे, तर देशातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या सहज संवाद साधण्याच्या सुविधा अधोरेखित होतात.