Lighting Deepak: धनत्रयोदशीच्या दिवशी घरात या 3 ठिकाणी दिवा लावायलाच हवा, लगेच शुभ परिणाम

Last Updated:

Lighting Deepak: धनत्रयोदशी हा दिवस आरोग्य, समृद्धी आणि धनाशी जोडला गेला आहे. या निमित्ताने लोक सोने-चांदी, पितळ, तांबे यांची भांडी आणि नवीन वस्तू खरेदी करतात. पण सर्वात खास परंपरा असते ती म्हणजे दिवे लावण्याची, जी धन आणि सौभाग्याला आकर्षित करणारी मानली गेली आहे.

News18
News18
मुंबई : धनत्रयोदशीचा सण यावर्षी १८ ऑक्टोबर, शनिवार रोजी साजरा केला जाईल. हा दीपोत्सवाचा पहिला दिवस असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी आणि कुबेर देव यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते, अशी मान्यता आहे.
म्हणूनच हा दिवस आरोग्य, समृद्धी आणि धनाशी जोडला गेला आहे. या निमित्ताने लोक सोने-चांदी, पितळ, तांबे यांची भांडी आणि नवीन वस्तू खरेदी करतात. पण सर्वात खास परंपरा असते ती म्हणजे दिवे लावण्याची, जी धन आणि सौभाग्याला आकर्षित करणारी मानली गेली आहे.
दक्षिण दिशेला यमराजासाठी दिवा - धनत्रयोदशीच्या संध्याकाळी, दक्षिण दिशेकडे तोंड करून, पिठाच्या चौमुखी (चार वातींच्या) दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकून दिवा लावावा. हा दिवा यमराजाच्या नावाने लावला जातो, ज्याला ‘यम दीपम’ म्हणतात. शास्त्रात सांगितले आहे की, या दिव्यामुळे अकाली मृत्यूची भीती दूर होते आणि व्यक्तीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो. हा दिवा जीवनात सुरक्षा आणि शांततेचे प्रतीक मानला जातो.
advertisement
पूजा स्थळी लक्ष्मी-कुबेराचा दिवा - धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पूजा स्थळी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवापुढे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामध्ये तुपाचा दिवा लावणे सर्वात उत्तम मानले जाते. पूजेदरम्यान कुबेर मंत्राचा जप केल्याने विशेष फळ मिळते. मंत्र या प्रकारे आहे: ‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य अधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि दापय दापय स्वाहा।’ या दिव्यामुळे धन-संपत्तीत वाढ, कुबेराची कृपा आणि लक्ष्मीची स्थिरता प्राप्त होते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
advertisement
धनत्रयोदशीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर किंवा दाराबाहेर दिवा लावणे देखील अत्यंत आवश्यक मानलं जातं. हा दिवा दोन्ही बाजूला ठेवल्यास शुभ प्रभाव दुप्पट होतो. हा दिवा घरात सकारात्मकतेला (पॉझिटिव्हिटी) प्रवेश देतो आणि नकारात्मक ऊर्जेला (निगेटिव्ह एनर्जी) दूर करतो. वास्तूनुसार, हा दिवा घराच्या सुरक्षा कवचाप्रमाणे कार्य करतो.
advertisement
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी खऱ्या मनाने आणि विधी-विधानाने दिवा लावला गेला, तर घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा कायमस्वरूपी वास होतो, अशी मान्यता आहे. दक्षिण दिशेचा यम दिवा जीवनरक्षण देतो, पूजा स्थळाचा दिवा लक्ष्मी-कुबेराची कृपा आणतो आणि मुख्य दाराचा दिवा घरात सकारात्मकता आणतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Lighting Deepak: धनत्रयोदशीच्या दिवशी घरात या 3 ठिकाणी दिवा लावायलाच हवा, लगेच शुभ परिणाम
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement