माणसातला देव! 700 जणांना 30 रुपयांत भरपेट जेवण, पुणेकर स्वामी भक्ताची अशीही सेवा!

Last Updated:

Swami Samarth Poli Bhaji: पुण्यातील स्वामी भक्त अनिल आपटे हे समाजसेवा म्हणून रोज फक्त 30 रुपयांत जवळपास 700 जणांना मोफत जेवण देतात. गेल्या 7 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.

+
माणसातला

माणसातला देव! 700 जणांना 30 रुपयांत भरपेट जेवण, पुणेकर स्वामी भक्ताची अशीही सेवा!

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : माणूस म्हणून आपण समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना आणि स्वामी समर्थांवर असलेली भक्ती या माध्यमातून एक पुणेकर मोठं काम करतोय. पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुमठेकर रोड याठिकाणी श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र  चालवत आहेत. विशेष म्हणजे फक्त 30 रुपयांत मिळणाऱ्या जेवणासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात. दररोज 700 लोक इथं पोटभर जेवण करतात. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर तरुणांना कमी पैशात जेवण मिळावं, या उद्देशाने आपटे यांनी पोळी भाजी केंद्राची सुरुवात केलीये. याबाबत त्यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
बाहेर गावावरून जी मुलं शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यांच्याकडे मोजकेच पैसे असतात. शिक्षण सांभाळत जर जेवणाचा खर्च कमी झाला तर यासाठी आपण काही तरी करू शकतो, अशी कल्पना अनिल आपटे यांच्या डोक्यात आली. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे त्याला जोड देत श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र 2017 मध्ये सुरु केले. जवळपास गेली 7 वर्ष ते चालवत आहेत.
advertisement
3 ठिकाणी पोळीभाजी केंद्र
श्री स्वामी समर्थ पोळीभाजी केंद्र आपटे हे वर्षभर चालवतात. रोज दुपारी 12 ते 2.30 या वेळात तीन ठिकाणी हे केंद्र सुरु आहे. सहकार इथे सातव हॉल, कुमठेकर रस्ता आणि सारसबाग इथे हे केंद्र सुरू अशते. विशेष म्हणजे ते हे सगळं समाज कार्य म्हणून करत आहेत. लोकांसाठी काही तरी देणं लागतं, या भावनेतून ते पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. गरीब हमाल लोकांना कमीत कमी खर्चात चांगलं जेवण मिळावं हा उद्देश असल्याने हा उपक्रम सुरू असून या कामामुळे 15 लोकांना रोजगार मिळत आहे. फक्त 30 रुपयांत हे जेवण देत असून रोज 700 जण भरपेट जेवतात, असंही आपटे सांगतात.
advertisement
दरम्यान, प्रत्येक दिवशी वेगळा मेनू असतो. यामध्ये पोळी भाजी, चटणी आणि भात असं एकवेळचं पोटभर जेवण दिलं जातं. बुधवार आणि गुरुवारी मेनू ठरलेला आहे. बुधवारी पोळीभाजी करणाऱ्या महिलांना एक दिवस सुट्टी मिळावी हा उद्देश असतो. या दिवशी पावभाजी आणि पुलाव हा मेनू असतो. तर गुरुवारी स्वामींचा प्रसाद म्हणून पिठलं – भाकरी, खिचडी आणि खर्डा असा मेनू असतो. या दिवशी वेगळा मेनू असल्याने 1 हजार लोकं जेवतात. इतर वेळी ही संख्या 700 पर्यंत असते, असंही अनिल आपटे सांगतात.
view comments
मराठी बातम्या/Food/
माणसातला देव! 700 जणांना 30 रुपयांत भरपेट जेवण, पुणेकर स्वामी भक्ताची अशीही सेवा!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement