Mumbai Water Supply: मुंबईकर करतायेत आजारांचं सेवन! पिण्याचं 0.46 टक्के पाणी दूषित

Last Updated:

Mumbai Water Supply: मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईतील पिण्याच्या पाण्यापैकी 0.46 टक्के पाणी दूषित आहे.

Mumbai Water Supply: मुंबईकर करतायेत आजारांचं सेवन! पिण्याचं 0.46 टक्के पाणी दूषित
Mumbai Water Supply: मुंबईकर करतायेत आजारांचं सेवन! पिण्याचं 0.46 टक्के पाणी दूषित
मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा वार्षिक पर्यावरण अहवाल समोर आला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याबाबत सर्वात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महापालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालानुसार, मुंबईतील बी वॉर्ड परिसरातील भेंडी बाजार, मस्जिद बंदर, एच पूर्व मधील वांद्रे, सांताक्रूझ तसेच ए वॉर्डातील कुलाबा, कफ परेड या भागात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा होतो. सी वॉर्डातील मरिन ड्राइव्ह, काळबादेवी, एन वॉर्डातील विद्याविहार, विक्रोळी पार्क साईट, पी उत्तर विभागातील मालवणी, मढ, मालाड भागात सर्वाधिक शुद्ध पाण्याचा पुरवाठा होतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पिण्याच्या पाण्यापैकी 0.46 टक्के पाणी दूषित आहे. मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांच्या मोठ्या जाळ्याद्वारे हा पाणीपुरवठा केला जातो. त्या जाळ्यांची वेळोवेळी साफसफाई न केल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यात पुराचं पाणी साचल्याने, वितरण प्रणालीतील जुन्या आणि नवीन बांधकामामुळे, झोपडपट्ट्यांमधील बेकायदेशीर नळ जोडणी, नळ गळती, खराब पाईप आणि योग्य देखभाल न केल्याने पाणी दूषित होऊ शकतं.
advertisement
पालिकेकडून रोज जवळपास 150-180 आणि पावसाळ्यात किंवा आपत्कालीन काळात जवळपास 200-250 पाण्याचे नमुने विविध जलाशय तसेच जलवितरण प्रणालीमधून गोळा करून तपासले जातात. मानकानुसार, पिण्याचं पाणी कोलिफोर्म आणि ई-कोलाय या जीवाणूंपासून मुक्त असलं पाहिजेत. जर पिण्याच्या पाण्यात हे दोन घटक आढळले तर पाणी दूषित समजलं जातं.
advertisement
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी भांडुप येथे पाण्यावर ट्रीटमेंट केली जाते. तसेच पुढे वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचीही गुणवत्ता तपासली जाते. यामुळे अधिकाऱ्यांना पाण्याच्या गुणवत्तेची आणि त्याच्या संभाव्य धोक्यांची माहिती होते,
जे. जे. हॉस्पिटलमधील असोसिएट प्रोफेसर डॉ. मधुकर गायकवाड म्हणाले, "दुषित पाण्यामुळे अतिसाराचा त्रास होतो. पोटाचा संसर्ग होऊ शकतो. गॅस्ट्रो, काविळ, ई-कोलाय हे आजारही होतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यायलं पाहिजे."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Water Supply: मुंबईकर करतायेत आजारांचं सेवन! पिण्याचं 0.46 टक्के पाणी दूषित
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement