आजचं हवामान: २५ नोव्हेंबरला हवामानात होणार मोठा बदल, वादळामुळे अवकाळीचं संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. अमित भारद्वाज यांच्या माहितीनुसार दक्षिण भारतात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, महाराष्ट्रात थंडी वाढणार, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. अमित भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज हवामानात महत्त्वाचे बदल होणार आहेत. हळूहळू थंडी कमी झाली असून दमट आणि उष्ण हवामान होत चाललं आहे. एकीकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तर दुसरीकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर असलेले 'वेलमार्क लो प्रेशर एरिया तर दुसरीकडे २५ नोव्हेंबर रोजी कोमोरीन प्रदेश नैऋत्य बंगालचा उपसागर आणि श्रीलंका किनारपट्टीच्या भागात दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही सिस्टीममुळे दक्षिण भारतासह अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट
एकाच वेळी दोन ठिकाणी वादळं येणार असल्याने त्याचा परिणाम हवामानावर झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत २१ सेंटीमीटरपेक्षा जास्त 'अतिमुसळधार' पाऊस नोंदवला गेला आहे. केरळ आणि तामिळनाडूसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. लक्षद्वीप बेटे, अंदमान-निकोबार बेटे, रायल सीमा आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात आज 'यलो अलर्ट'सह जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर 'ऑरेंज अलर्ट' कायम आहे, तर लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे.
advertisement
महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; तापमान २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता
पश्चिम आणि मध्य भारताच्या तुलनेत महाराष्ट्राच्या हवामानात महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. पुढील चार दिवसांच्या (२४ ते २७ नोव्हेंबर) काळात महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसपर्यंत हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, सध्या जाणवत असलेल्या थंडीच्या तुलनेत येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रात गारठा वाढेल आणि नागरिकांना अधिक थंडीचा अनुभव मिळेल. त्यानंतर मात्र तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. त्यामुळे, नागरिकांनी अचानक वाढणाऱ्या थंडीसाठी तयार राहावे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये दमट हवामान झालं आहे. थंडी गायब झाल्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. डिसेंबर महिन्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
उत्तर-पश्चिम भारत आणि इतर भागातील हवामान
उत्तर-पश्चिम भारतात पुढील चार दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसची लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढेल. दुसरीकडे, पश्चिम उत्तर प्रदेशात आज आणि उद्या दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उर्वरित भागांमध्ये किमान तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही.
advertisement
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला
view commentsबंगालच्या उपसागरामध्ये हवामान प्रणाली सक्रिय होत असल्याने, समुद्रातील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. मच्छिमारांनी आजपासून पुढील पाच दिवसांपर्यंत मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. जे खोल समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीनं मागे फिरावं असं आवाहन करण्यात आलं आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: २५ नोव्हेंबरला हवामानात होणार मोठा बदल, वादळामुळे अवकाळीचं संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?


