भाजपने सिंचन घोटाळा आणि कोर्ट निकालाची आठवन करून दिली, अजितदादा नरमले, म्हणाले, मी त्यांना बोललोच नव्हतो....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar PCMC Election: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोट ठेवत स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : गेल्या चार दिवसांपासून भारतीय जनता पक्षावर आरोपांची राळ उडवलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर एक पाऊल मागे घेत स्थानिक नेत्यांसंबंधी मी बोलतो आहे, राज्याच्या नेत्यांवर मी टीका केलेली नाही, असे सांगून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मी स्थानिक नेत्यांवर बोललेलो असताना माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने बातम्या दाखवल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्युत्तरे दिली, असे म्हणत अजित पवार यांनी माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची पूर्ण चौकशी झालेली नाही, अद्याप न्यायालयात प्रकरण सुरू आहे, हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे सांगितल्यावर अजित पवार एक पाऊल मागे आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोट ठेवत स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी, आम्ही पुस्तकाची मागील पानं पलटली तर अजित पवारांना बोलताही येणार नाही, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्यानंतर अजित पवार यांनी राजकीय शहाणपण दाखवून नरमाईची भूमिका घेतली.
advertisement
अजित पवार यांचे एक पाऊल मागे
भाजपसोबतच्या राजकीय संघर्षावर विचारले असता अजित पवार यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली. मी स्थानिक नेत्यांवर आरोप केले होते. किंबहुना मी पुरावे देखील दिले. वरिष्ठ भाजप नेत्यांबद्दल मी कोणताही आरोप केला नाही किंवा टीका केली नाही. केंद्रात आणि राज्यातले एनडीए सरकार अत्यंत व्यवस्थित काम करीत आहे. परंतु माध्यमांनी मी वरिष्ठ भाजप नेत्यांवर आरोप केले, असे चित्र बातम्यांमधून उभे केले, असे सांगत भाजपसोबतच्या संघर्षात अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतले.
advertisement
....म्हणून अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेतली
अजित पवार यांनी विचार करून बोलावे. तसेच ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांसोबतच मी सत्तेत बसलोय, हे सांगणे भूषणावह नाही, असे सुनावत न्यायालयाचा निकाल अद्याप बाकी असल्याची आठवण बावनकुळे यांनी करून दिल्यावर अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
भाजपला नेमकी तीच गोष्ट खटकली!
advertisement
पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं खरं तर पवारांचा बालेकिल्ला. परंतु २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही शहरांवर कब्जा मिळवला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून दोन्ही महापालिका हिसकावून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. बालेकिल्ला हातून गेल्याची रूखरूख अजित पवार यांना लागून राहिली आहे. आता तोच बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार कंबर कसून कामाला लागले आहेत. याची सुरुवात त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून केली. मात्र हीच गोष्ट भाजपला खटकली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 6:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपने सिंचन घोटाळा आणि कोर्ट निकालाची आठवन करून दिली, अजितदादा नरमले, म्हणाले, मी त्यांना बोललोच नव्हतो....











