पश्चिम बंगालकडून येतंय मोंथा चक्रीवादळ, महाराष्ट्रावर होणार परिणाम, 5 दिवस कसं राहील हवामान?

Last Updated:

मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील ४८ तासात अवकाळी पावसाचा फटका, कोकण, पुणे, मुंबई, विदर्भात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना पिके सुरक्षित ठेवण्याचा सल्ला.

News18
News18
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या दोन शक्तिशाली डिप्रेशन आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. महाराष्ट्रात दोन दिवस अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अरबी समुद्रातील Depression आणि बंगालच्या उपसागरातील 'चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याच्या चारही विभागांत पावसाचा अंदाज आहे.
या चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेली प्रणाली 25 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यात आणि 27 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये 27,28 आणि 29 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. 26 ऑक्टोबरपासून मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावर अधिक परिणाम
advertisement
या दोन हवामान प्रणालींचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येईल. यामुळे कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांचे दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह जोरदार सरी अपेक्षित आहेत. मुंबई, गोवा आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांतही ढगाळ वातावरण राहून, विजांच्या कडकडाटासह मान्सूननंतरचा पाऊस हजेरी लावू शकतो.
advertisement
२६ ऑक्टोबरला पाऊस आणखी वाढणार
२६ ऑक्टोबर: अरबी समुद्रातील प्रणाली उत्तरेकडे सरकत असल्याने गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. दक्षिण मराठवाडा-विदर्भ: तेलंगणा आणि छत्तीसगडला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या भागांतही पावसाची शक्यता आहे.
उत्तराकडून गारठा येण्यास सुरुवात
राज्याच्या पावसाळी वातावरणादरम्यान, उत्तर भारतातून थंड वारे येण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (२५ ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत रात्री आणि पहाटे थंडी जाणवायला सुरुवात होईल. २७ ऑक्टोबरनंतर उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे कापणीसाठी तयार असलेली पिके (कापूस, सोयाबीन) आणि रब्बी हंगामातील पिकांची पेरणी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित स्थळी ठेवावीत, तसेच फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पश्चिम बंगालकडून येतंय मोंथा चक्रीवादळ, महाराष्ट्रावर होणार परिणाम, 5 दिवस कसं राहील हवामान?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement