पत्नीसोबत फिरायला गेलेला गडचिरोलीतील तरुण; लग्नानंतर 4 दिवसातच नवरीच्या डोळ्यादेखत धक्कादायक शेवट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
लग्नाच्या चौथ्या दिवशीच बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडली
गडचिरोली (महेश तिवारी, प्रतिनिधी) : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. असं म्हणतात, की या दिवसापासून आपण एका नव्या आयुष्यात प्रवेश करतो. या दिवसानंतर आपल्या प्रत्येक सुख-दुःखात एक जोडीदार आपल्यासोबत नेहमी उभा असतो. मात्र, गडचिरोलीतील एका नवरदेवासोबत भयंकर घडलं. लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला.
लग्नाच्या चौथ्या दिवशीच बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडली. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27) रा. चंद्रपूर असं नवरदेवाचं नाव आहे. यात घटनेत नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृतकाचं नाव आहे.
advertisement
नवनीत हा लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत फिरायला गेला होता. तेव्हाच तो पाण्यात बुडू लागला. तो पाण्यात बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी बादल हेमके धावले. यावेळी या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते. ते भामरागड येथे राहत होते. हेमके आणि धात्रक यांचं कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेलं होतं. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
advertisement
किरकोळ वादातून पत्नी आणि मुलीसमोर खून
view commentsछत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रात्री १० वाजेच्या सुमारास टपरी चालकाचा किरकोळ वादातून पत्नी आणि मुलीसमोरच चाकूने सपासप वार करत खून केल्याची घटना घडली. रस्त्यावरील हा प्रकार पाहून नागरिकही भयभीत झाले. या घटनेत सुनील राठोड यांचा मृत्यू झाला आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2024 9:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पत्नीसोबत फिरायला गेलेला गडचिरोलीतील तरुण; लग्नानंतर 4 दिवसातच नवरीच्या डोळ्यादेखत धक्कादायक शेवट


