advertisement

Maharashtra Cabinet Decision: SC आरक्षण उपवर्गीकरणाबाबत समिती स्थापन, राज्य मंत्रिमंडळाचे मोठे ६ निर्णय

Last Updated:

Maharashtra Cabinet: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ५ महत्त्वाचे निर्णय घेतले.

राज्य मंत्रिमंडळ बैठक
राज्य मंत्रिमंडळ बैठक
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करून राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबवविणार असल्याचा मोठा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बैठकीत महसूल, सामाजिक न्याय, पर्यावरण, दिव्यांग कल्याण आदी विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय?

१) अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार (जलसंपदा, विभाग)
advertisement
२) महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग )
३) अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग)
४) अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती (सामाजिक न्याय विभाग)
advertisement
५) भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा (महसूल विभाग)
६) राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ (दिव्यांग कल्याण विभाग)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Decision: SC आरक्षण उपवर्गीकरणाबाबत समिती स्थापन, राज्य मंत्रिमंडळाचे मोठे ६ निर्णय
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement