शालिनीताईंच्या निधनानंतर शरद पवार गहिवरले; म्हणाले जितक्या जाहीरपणे माझ्यावर टीका...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी भावूक ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. शालिनीताई पाटील या 94 वर्षाच्या होत्या. वृधापकाळाने त्यांचं मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी निधन झालं. रविवारी साताऱ्यातील कोरेगाव इथं त्यांच्या मुळ गावी अंत्य संस्कार केले जाणार आहे. शालिनीताई पाटील यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शालिनीताई पाटील यांच्यातील वाद महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. शरद पवारांवर या ना त्या कारणाने आगपाखड करणाऱ्या याच शालिनीताईंनी राष्ट्रवादीतील फुटीवर केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं. शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी भावूक ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
शरद पवार काय म्हणाले?
राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने 'शरदचं नेतृत्व मान्य करा' . हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
advertisement
वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची नेहमीच चर्चा
राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची नेहमीच चर्चा होते. अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांवर याचे खापर फोडताना मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवारांनी कसं पाडलं याचा दाखलाही देत असतात. शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 'पुलोद' प्रयोग खूप गाजला होता. या घटनेला शालिनीताईंनी शरद पवारांनी 'वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे म्हणत शरद पवारांवर टीका केली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शालिनीताईंच्या निधनानंतर शरद पवार गहिवरले; म्हणाले जितक्या जाहीरपणे माझ्यावर टीका...











