लाल किल्ल्यावरुन तरुणांसाठी मोदींचं गिफ्ट! विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू, कोण करू शकतं अर्ज?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जाहीर केली. या योजनेतून तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील. 1 लाख कोटींचं बजेट असून 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे.
देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पीएम मोदी यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. लाल किल्ल्यावरुन पीएम नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. ही फक्त घोषणा नाही तर तरुणांसाठी खास गिफ्ट आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू होणार असल्याचं जाहीर केलं. या योजनेंतर्गत तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील, ही योजना नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा कुणाला होणार कोण अर्ज करू शकतं जाणून घेऊया सविस्तर.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना काय आहे?
पीएम मोदी सरकारने याआधी Employment Linked Incentive नावाची योजना आणली होती. त्याच धरतीवर ही योजना सुरू केली आहे. याच योजनेला विकसित भारत रोजगार योजना नाव देण्यात आलं आहे. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15000 रुपये मिळणार आहेत. फ्रेशर्सना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकार प्रति कर्मचारी 3000 रुपयांपर्यंत मदत देईल. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवली जाईल. या योजनेसाठी 1 लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.
advertisement
यामागे नेमका काय उद्देश आहे?
ही योजना विशेषतः तरुणांसाठी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) आणि उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करते. ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत चालेल. दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याची योजना आहे.
advertisement
या योजनेद्वारे, तरुणांना, विशेषतः 18-35 वयोगटातील तरुणांना कुशल बनवून नोकरीसाठी तयार करायचे आहे. ही योजना 'मेक इन इंडिया'ला चालना देईल. यामुळे लोकांचे कौशल्य देखील सुधारेल. यामुळे त्यांना पेन्शन, विमा यासारख्या सामाजिक सुरक्षा सेवा देखील मिळतील. या योजनेचे उद्दिष्ट अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघु आणि मध्यम व्यवसायांना म्हणजेच एमएसएमईंना पाठिंबा देणे आहे.
advertisement
कधी आणि कसा येणार पहिला हप्ता?
पहिला हप्ता 6 महिन्यांच्या नोकरीनंतर आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या नोकरीनंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल. बचतीच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रोत्साहनाचा एक भाग बचत खात्यात किंवा ठेवीत ठेवला जाईल जो कर्मचारी नंतर काढू शकेल. या भागाचा फायदा सुमारे 1.92 कोटी नवीन कर्मचाऱ्यांना होईल.
advertisement
कर्मचाऱ्यांना कसे मिळणार पैसे?
view commentsज्या कर्मचाऱ्यांचा पगार 10,000 रुपये आहे त्यांना 1 हजार रुपये, ज्यांना 20 हजार रुपयांपर्यंत पगार आहे त्यांना 2 हजार रुपये, 20 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार आहे त्यांना 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश आत्मनिर्भर भारत करणे, रोजगार करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 8:57 AM IST
मराठी बातम्या/मनी/
लाल किल्ल्यावरुन तरुणांसाठी मोदींचं गिफ्ट! विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू, कोण करू शकतं अर्ज?


