गौराई येते माहेरी, अलिबागमधील 50 वर्षांची परंपरा नेमकी काय, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
अलिबागमधील मोठे शाहपुर या गावात भारती पाटील यांच्या घरात मागील 50 वर्ष गौराइचे आगमन होते आहे. यावेळेस त्या त्यांच्या गौराईचा साजशृंगार करतात. तिला सजवतात. तिला आगरी कोळी परंपरेनुसार लूक करतात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
अलिबाग : गौरी गणपतीत कोकणात ओवश्याला खूप महत्त्व आहे. गणपतीत चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गौराईचे आगमन होते. अलिबागमध्येही गेले 50 वर्ष एका घरात गौराईचे आगमन होत आहे. अलिबागमध्ये अनेक घरांमध्ये गौराई येते. तिला दागिन्यांनी सजवले जाते तिचा साजशृंगार केला जातो.
अलिबागमधील मोठे शाहपुर या गावात भारती पाटील यांच्या घरात मागील 50 वर्ष गौराइचे आगमन होते आहे. यावेळेस त्या त्यांच्या गौराईचा साजशृंगार करतात. तिला सजवतात. तिला आगरी कोळी परंपरेनुसार लूक करतात.
advertisement
याची परंपरा किंवा यामागची कथा काय असे विचारल्यावर त्या सांगतात की, गौराई जेव्हा माहेरहुन सासरी जाते तेव्हा तिची सासू तिला विचारते, तू माहेरी काय जेवलीस, तेव्हा गौराई म्हणते मी पोळी, साजुक तूप असं अन्न जेवली. त्यावर विश्वास न ठेवता गौराईचा छळ करणारी तिची सासू तुझे माहेर गरीब म्हणून तिला खूप त्रास देते आणि तेव्हापासूनच गौराई माहेरी आली की माहेरवाशीण म्हणून घरातील लोकं तिची मनोभावे पूजा करुन तिला साग्रसंगीत स्वयंपाक देऊन दागदागिन्यांनी मढवतात. गौराइचे खूप लाड करतात, अशी यामागची आख्यायिका आहे.
advertisement
कोकणात या गौराईचे पूजन करताना तेरडे, नागवेल अशा पाच वनस्पतींची पूजा करुन या वनस्पतींना साडी नेसून तिचा साजशृंगार केला जातो. 'मी गेले 50 वर्ष घरात गौराई बसवत आहे. आमच्या अलिबागमध्ये कोकणात या सगळया सणांना खूप महत्त्व आहे. त्यात ओवसा म्हणजे स्त्रियांचा आपुलकीचा सण', या शब्दात मोठे शहापुर गावातील भारती पाटील यांनी आपल्या भावना लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या.
Location :
Alibag,Raigad,Maharashtra
First Published :
September 12, 2024 2:16 PM IST