Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! मंगळवारी 18 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

Last Updated:

Navi Mumbai Water Shortage: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

News18
News18
प्रतिनिधी विश्वनाथ सावंत
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील एम.बी.आर.मध्ये नवीन जलवाहिनी जोडणी तसेच मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसविणे आणि देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून, यासाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा १८ तासांसाठी बंद राहणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार ५ नोव्हेंबर पहाटे ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील. या काळात बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडणी असलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोड मधील पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद राहील.
advertisement
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहील, तर बुधवारी सकाळचा व संध्याकाळचा पुरवठा कमी दाबाने होणार आहे. म्हणून महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! मंगळवारी 18 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement