पुतिन असोत किंवा नेतन्याहू... जागतिक नेत्यांसोबत मोदींचे खास कनेक्शन, अमित शहांनी उलगडले गुपित
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
अमित शाह यांनी मोदी यांच्या कूटनीती, व्लादिमीर पुतिन, बेंजामिन नेतन्याहू, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध, कलम ३७० हटवणे आणि भारताच्या सुरक्षेवरील ऐतिहासिक निर्णय यावर प्रकाश टाकला.
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनोख्या कूटनीतीवर मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की- मोदी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रोटोकॉलच्या पलीकडे जाऊन एक वैयक्तिक संबंध (personal connection) निर्माण करतात, पण तो संबंध नेहमीच भारताच्या हितासाठी असतो. मग ते व्लादिमीर पुतिन असोत, बेंजामिन नेतन्याहू असोत किंवा डोनाल्ड ट्रम्प असोत, मोदींनी प्रत्येक मोठ्या जागतिक नेत्यासोबत असे संबंध निर्माण केले. ज्यामुळे भारताला कूटनीतीत अभूतपूर्व फायदे झाले.
advertisement
नेटवर्क18 चे एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांच्याशी केलेल्या खास बातचीतमध्ये अमित शाह म्हणाले की- जेव्हा एखादा नेता देशाला उंचीवर नेण्याच्या ध्येयासाठी काम करतो, तेव्हा प्रोटोकॉल महत्त्वाचे ठरत नाहीत. मोदींमध्ये हाच गुण आहे की ते अहंकाराला सोडून प्रत्येक स्तरावरील व्यक्तीसोबत जोडले जातात. ते म्हणाले- मी मोदींना लहान-लहान कार्यकर्त्यांना प्रेरणा देताना पाहिले आहे आणि मोठ्या नेत्यांची मनधरणी करतानाही पाहिले आहे. त्यांचे एकच उद्दिष्ट असते की, पक्ष, राज्य आणि राष्ट्र व्यवस्थित चालावे.
advertisement
मोदींच्या वैयक्तिक संबंधांमुळे भारताला असे फायदे मिळाले आहेत, जे गेल्या ८० वर्षांच्या कूटनीतीतूनही मिळू शकले नाहीत. ते म्हणाले की, मी सार्वजनिकरित्या सर्व काही सांगू शकत नाही. पण अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या विलक्षण होत्या आणि ज्यामुळे भारताला ऐतिहासिक लाभ झाला.
कलम ३७० का हटवले?
advertisement
मुलाखतीत कलम ३७० रद्द करण्यावर प्रश्न विचारला असता, अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की- भाजपची विचारसरणी सुरुवातीपासूनच हीच राहिली आहे. जनसंघाचे पहिले अध्यक्ष श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी आपले जीवनच कलम ३७० हटवण्यासाठी समर्पित केले होते. पण भाजपला कधीच इतके मोठे बहुमत मिळाले नव्हते की हे पाऊल उचलू शकले असते. मोदी दुसऱ्यांदा दोन-तृतीयांश बहुमताने सत्तेवर परतल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात हे कलम हटवण्यात आले.
advertisement
शाह म्हणाले की- कलम ३७० हटवणे हा केवळ एक राजकीय निर्णय नव्हता. तर देशाची सुरक्षा आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनेही एक ऐतिहासिक पाऊल होते. यामुळे जगाला स्पष्ट संदेश गेला की काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या सुरक्षेत, दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात आणि जागतिक स्तरावर काश्मीरबाबत भारताची बाजू मजबूत करण्यात जे यश मिळाले; ते कदाचित याआधी कधीच मिळाले नव्हते, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
advertisement
अमित शाह यांनी याला मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक म्हटले आणि सांगितले की, येणाऱ्या अनेक शतकांपर्यंत देशातील जनता या निर्णयाची आठवण ठेवेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 10:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
पुतिन असोत किंवा नेतन्याहू... जागतिक नेत्यांसोबत मोदींचे खास कनेक्शन, अमित शहांनी उलगडले गुपित