पाकिस्तानला 7 आकड्याची धास्ती, ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण, नेमकं काय स्थिती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने 7 मे रोजी पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचे महत्त्वाचे एअरबेस आणि दहशतवादी तळ नष्ट झाले.
मुंबई: 7 तारीख पाहिली तरी पाकिस्तानच्या काळजात आता धस्स होईल, पाकिस्तान ही तारीख कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्यासाठी ही रात्र काळरात्र ठरली. 20 ते 22 मिनिटांत जे घडलं त्याने सारं काही उद्ध्वस्त झालं. पाकिस्तानचे महत्त्वाचे एअरबेस उद्ध्वस्त झाले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आणि पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर पुन्हा एकदा उघडकीस आला. पहलगामनंतर दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं. त्याच ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केला होता. आज या घटनेला बरोबर एक महिना पूर्ण झाला.
खरं तर, आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे 7 मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर केलं. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर स्ट्राईक करुन उद्ध्वस्त केलं. मुदिरके असो किंवा बहावलपूर, प्रत्येक दहशतवादी तळाचं मोठं नुकसान झालं होतं. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दिलेल्या वेदनांबद्दल पाकिस्तान अजूनही शोक करत आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं. पहलगाम हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.
advertisement
पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला ऑपरेशन सिंदूर केलं होतं. 7 मे रोजी रात्री 1:05 ते 1:30 दरम्यान 22 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानला जमीनदोस्त केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. शेकडो दहशतवादी मारले गेले. यामध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला. 8 मे रोजीची सकाळ भारतासाठी उत्सव आणि पाकिस्तानसाठी शोक होती. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला होता.
advertisement
तुम्ही हा QR कोड स्कॅन करून न्यूज18 च्या पोलमध्ये सहभागी व्हा!

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने ब्राह्मोस, स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रे तसेच इस्रायलच्या मदतीने विकसित केलेल्या कामिकाझे ड्रोनचा वापर केला. दहशतवादी अड्ड्यांव्यतिरिक्त, भारताने पाकिस्तान सरकारलाही दुखावले. भारतीय सैन्याने नूर खान, मुरीद, रफीकी आणि सियालकोट सारख्या पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य केले. यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले. शेवटी, पाकिस्तानला ब्राह्मोसच्या शक्तीसमोर झुकावे लागले आणि युद्धबंदीची विनंती करावी लागली.
advertisement
7 मे नंतरही भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवले. 10 मे पर्यंत पाकिस्तानला माघार घेण्याशिवाय. पर्याय नव्हता. त्याने युद्धबंदीची विनंती करण्यास सुरुवात केली. अखेर, भारतानेही आपले उद्दिष्ट साध्य केल्यानंतर युद्धबंदीला सहमती दर्शविली. या ऑपरेशनने जागतिक स्तरावरही खळबळ उडाली. भारताने ऑपरेशन सिंदूर का सुरू केले आणि त्याने पाकिस्तानमध्ये कसा कहर केला हे संपूर्ण जगाला सांगितले जात आहे. शशी थरूर आणि इतर शिष्टमंडळ सदस्य पाकिस्तानला जगासमोर आणण्यात व्यस्त आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
June 07, 2025 1:07 PM IST