देशासाठी गंभीर इशारा, प्रत्येक वर्षी 2 लाख; ही आकडेवारी मान शरमेने खाली घालवणारी

Last Updated:

Indian Citizenship: गेल्या पाच वर्षांत तब्बल 10 लाखांहून अधिक भारतीयांनी आपली भारतीय नागरिकता सोडली आहे. रोजगार, स्थायिकता आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात भारतीय मोठ्या प्रमाणावर परदेशात स्थलांतर करत आहेत.

News18
News18
नवी दिल्ली: तुम्हाला माहिती आहे का? गेल्या 5 वर्षांमध्ये 10 लाखांहून अधिक भारतीयांनी आपली भारतीय नागरिकत्व सोडले आहे? परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) ताज्या आकडेवारीनुसार, 2019 ते 2024 या कालावधीत 10,40,860 भारतीयांनी स्वेच्छेने आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर केले आहेत. म्हणजे दरवर्षी सरासरी 2 लाख लोक भारताला ‘गुडबाय’ म्हणत आहेत.
संसदेत उघड
संसदेच्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने ही वाढती प्रवृत्ती मान्य केली. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार:
2019: 1 लाख 44 हजार 017 लोकांनी नागरिकता सोडली
2020: ही संख्या घसरून 85 हजार 256 झाली
2021: वाढून 1 लाख 63 हजार 370 झाली
2022: विक्रमी पातळी गाठली – 2 लाख 25  हजार 620
advertisement
2023: 2 लाख 16 हजार 219 लोकांनी नागरिकता सोडली
2024: 2 लाख 06 हजार 378 लोकांनी भारत सोडला
भारतीय कोणत्या देशात जात आहेत?
भारतीय नागरिक जवळपास 135 देशांमध्ये जाऊन स्थायिक होत आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यासारखे विकसित देश आहेतच. पण त्याचबरोबर आइसलँड, ब्राझील, अँटीग्वा अँड बारबुडा, व्हॅटिकन यांसारख्या कमी परिचित देशांमध्येही भारतीय नागरिकत्व स्वीकारले जात आहे.
advertisement
भारतीय नागरिकता का सोडत आहेत?
सरकारच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक सोय, परदेशातील नोकरी, कायमस्वरूपी निवास किंवा अधिक चांगल्या जीवनशैलीची इच्छा ही यामागची प्रमुख कारणे आहेत. भारतात दुहेरी नागरिकतेची परवानगी नाही. त्यामुळे कोणीही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्यास त्याला आपली भारतीय नागरिकता सोडावी लागते.
भारतीय संविधानातील अनुच्छेद 9 आणि नागरिकता कायदा 1955 च्या कलम 9 नुसार दुहेरी नागरिकता मान्य नाही.
advertisement
श्रीमंतही देश सोडत आहेत
एका अहवालानुसार, 2025 मध्ये जवळपास 3,500 भारतीय कोट्यधीश परदेशात स्थायिक होण्याची योजना आखत आहेत. 2023 आणि 2024 मध्ये ही संख्या अनुक्रमे 5,100 आणि 4,300 होती. म्हणजेच श्रीमंत भारतीयांमध्येही ही प्रवृत्ती अद्याप टिकून आहे, जरी ती थोडीशी घटलेली दिसते.
भारतीय नागरिकता कशी सोडता येते?
जर एखाद्या भारतीयाला आपली नागरिकता सोडायची असेल, तर त्याला indiancitizenshiponline.nic.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्याचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची तपासणी जिल्हाधिकारी किंवा भारतीय मिशनमधील कन्स्युलर अधिकाऱ्याद्वारे केली जाते. संबंधित विभाग 30 दिवसांत उत्तर देतो. जर कोणतीही हरकत आली नाही तर 30 दिवसांनंतर नागरिकता रद्द झाल्याचे प्रमाणपत्र जारी केले जाते.
advertisement
भारताला चिंता वाटायला हवी का?
एकीकडे ही गोष्ट ग्लोबल सिटीझनशिप कडे झुकणारी प्रवृत्ती दर्शवते, पण दुसरीकडे हेही प्रश्न उपस्थित करते की – भारतात एवढे लोक स्वतःला संधीपासून वंचित का मानत आहेत?
सरकार आणि धोरणकर्त्यांनी आता हे समजून घेणे आवश्यक आहे की – लोकांनी इथे का राहावे? आणि ते परदेशात नक्की काय शोधत आहेत?
मराठी बातम्या/देश/
देशासाठी गंभीर इशारा, प्रत्येक वर्षी 2 लाख; ही आकडेवारी मान शरमेने खाली घालवणारी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement