Independence Day 2024 : आजही भारतीय रेल्वे करतेय इंग्रजांच्या या नियमाचं पालन, पण काय आहे कारण?

Last Updated:

रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पद्धत खूप जुनी आहे. मात्र, आता तंत्रज्ञान बदलले आहे. मात्र, तरीही ही व्यवस्था आजही कायम आहे.

भारतीय रेल्वे फाईल फोटो
भारतीय रेल्वे फाईल फोटो
रजत कुमार, प्रतिनिधी
इटावा : आज संपूर्ण देशात भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. पण भारतातील हजारो वीर जवानांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंग्रजांनी भारत देश सोडून आज इतकी वर्ष झाली आहेत. मात्र, आजही भारतीय रेल्वे इंग्रजांनी तयार केलेल्या नियमांचे पालन करत आहेत. हे नियम कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
कोणते आहेत हे नियम -
भारतीय रेल्वेला साखळी बांधण्याचा नियम इंग्रजांनी फार पूर्वीच केला होता. मात्र, आजही भारतीय अधिकारी त्या नियमाचे पालन करत आहेत. आज भारतात सुपरफास्ट ट्रेन्स धावत आहेत. इग्रजांनी तयार केलेल्या नियमांनुसार देशभरात रेल्वेच्या बोगीच्या चाकांना साखळी कुलुपाने बांधले जाते. इंग्रजांच्या राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असूनही आज या नियमांचे पालन केले जात आहे.
advertisement
उत्तर प्रदेशातील इटावा रेल्वे स्टेशन, सराय भूपत स्टेशन, भरथना असो किंवा आणखी कुठले रेल्वे स्टेशन असो सर्व जागेवर जेव्हा ट्रेनचालक आणि हेल्पर आपली ड्युटी संपवतो तेव्हा तो ट्रेनला लूप लाईनवर उभी करतो आणि मग जातो. त्यानंतर, ट्रेनच्या इंजिनच्या पुढे आणि ट्रेनच्या मागील बाजूस बोगीच्या चाकांना लॉक असलेली साखळी बांधली जाते.
advertisement
रेल्वे कर्मचारी काय म्हणाले -
रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पद्धत खूप जुनी आहे. मात्र, आता तंत्रज्ञान बदलले आहे. मात्र, तरीही ही व्यवस्था आजही कायम आहे. प्रत्येक स्टेशनवर उभ्या असलेल्या वाहनांना बांधले जाते. इंग्रजांनी हा नियम कोणत्या परिस्थितीत केला असेल, हे सांगता येणार नाही. पण आज भारतीय रेल्वे दिवसेंदिवस आपल्या सर्व विभागांना तंत्रज्ञान, सुरक्षा आणि सुविधांनी सुसज्ज करत आहे.
advertisement
बालविवाह रोखण्यासाठी केली चॅम्पियनची नेमणूक, छत्रपती संभाजीनगरमधील हा अनोखा उपक्रम तरी काय?
नाव न सांगण्याच्या अटीवर एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले की, तो बऱ्याच कालावधीपासून रेल्वेत कार्यरत आहे. जेव्हा एखादी मालगाडी स्टेशनवर येते आणि त्या गाडी चालकाची आणि हेल्परची ड्युटी संपते तेव्हा त्या ट्रेनच्या दोन बोगींना कुलूप आणि साखळीने बांधले जाते. सोबतच लाकडाचे तुकडे दोन्ही चाकांना थांबवण्यासाठी लावले जातात.
advertisement
संपूर्ण देशात आहे हा नियम -
इटावाच्या सराय भूपत रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक एन. एस.यादव यांनी ऑफ कॅमेरा सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे काम केले जाते. हा नियम आत्तापासून नाही तर सुरुवातीपासून आहे. त्यासाठी योग्य अभ्यासही केला जातो. हा नियम संपूर्ण भारतातातील रेल्वेला लागू आहे, असेही ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/देश/
Independence Day 2024 : आजही भारतीय रेल्वे करतेय इंग्रजांच्या या नियमाचं पालन, पण काय आहे कारण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement