Farmers Success Story: पारंपरिक शेतीला फाटा, शेतकऱ्यानं पिकवलं फायद्याचं पीक, कमाई 50 लाख!
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मराठवाड्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील लाडसावंगी येथील शेतकरी बाबासाहेब पडूळ हे गेल्या 14 वर्षांपासून फायद्याची शेती करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
“डाळिंब शेती करताना अनेक अडचणी निर्माण होतात. फळबागेवर रोगराई पसरण्याचं संकट कायम असतं. डाळिंब या फळावर तेल्या आणि प्लेग रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी होत असतो. मात्र आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी न्युट्रेशन लेवल केले तर तेल्या आणि प्लेग रोगाला हरवू शकतो. त्यामुळे बिकट परिस्थितीत देखील फळबाग फायदेशीर ठरू शकते,” असेही पडूळ सांगतात.
advertisement
advertisement
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रोगराईवर नियंत्रण मिळवणे या बाबी डाळिंब शेतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. तरुण शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे. दुसरीकडे कमी पैशात काम करण्यापेक्षा शेतीत मन लावून आणि नियोजनानुसार काम केलं तर 2 एकर शेतीत महिन्याकाठी 50 हजार रुपयांचे उत्पन्न निघू शकते, असे देखील पडूळ यांनी सांगितले.