गोवा - मुंबई विमान प्रवास, मराठी गायकाला पडला चांगलाच महागात; मोजावे लागले 4 लाख रूपये

Last Updated:
विमानाने गोव्याहून मुंबईला येण्यासाठी प्रसिद्ध मराठी गायकाच्या खिशाला तब्बल 4 लाखांची कात्री लागली आहे. विमान प्रवासासाठी गायकाला इतके पैसे कसे लागले?
1/9
कलाकार असोत किंवा गायक कार्यक्रमांसाठी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. इव्हेंट्साठी जाताना कलाकार नेहमीच विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. विमान प्रवास नेहमीच सुखकर होतो. पण एका प्रसिद्ध मराठी गायकाला फक्त गोव्याहून मुंबईला येण्यासाठी तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागलेत.
कलाकार असोत किंवा गायक कार्यक्रमांसाठी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. इव्हेंट्साठी जाताना कलाकार नेहमीच विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. विमान प्रवास नेहमीच सुखकर होतो. पण एका प्रसिद्ध मराठी गायकाला फक्त गोव्याहून मुंबईला येण्यासाठी तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागलेत.
advertisement
2/9
गायकाने त्याच्या इन्स्टाग्रामवर विमानाची तिकिटं शेअर करत ही माहिती दिली. गोव्याहून मुंबईला येण्यासाठी इतके पैसे कसे लागले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? यामागचं कारणही गायकानं सांगितलं. 
गायकाने त्याच्या इन्स्टाग्रामवर विमानाची तिकिटं शेअर करत ही माहिती दिली. गोव्याहून मुंबईला येण्यासाठी इतके पैसे कसे लागले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? यामागचं कारणही गायकानं सांगितलं.
advertisement
3/9
प्रसिद्ध मराठी गायक राहुल वैद्यबद्दल आपण बोलत आहोत. राहुल नुकताच गोव्याहून विमानानं मुंबईत आला. या विमान प्रवासासाठी त्याला तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागले. त्याने एका स्टोरीमध्ये डोक्याला हात लावला आहे. त्याखाली त्याने लिहिलंय,
प्रसिद्ध मराठी गायक राहुल वैद्यबद्दल आपण बोलत आहोत. राहुल नुकताच गोव्याहून विमानानं मुंबईत आला. या विमान प्रवासासाठी त्याला तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागले. त्याने एका स्टोरीमध्ये डोक्याला हात लावला आहे. त्याखाली त्याने लिहिलंय, "टेकऑफ करण्यासाठी आजचा दिवस तर सर्वात वाईट. उद्या रात्री कोलकात्यात आमचा शो आहे आणि अजूनही आम्ही तिथे कसं पोहोचणार आहोत, तेच माहिती नाही!"
advertisement
4/9
राहुल वैद्यनं दुसऱ्या स्टोरीमध्ये लिहिलंय,
राहुल वैद्यनं दुसऱ्या स्टोरीमध्ये लिहिलंय, "हे बोर्डिंग पास 4.20 लाखांचे आहेत, आणि तेही फक्त मुंबईपर्यंतचे आता मुंबई ते कोलकाता हा वेगळा खर्च.  माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा डोमेस्टिक प्रवास ठरणार आहे."
advertisement
5/9
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्स गेल्या तीन दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल समस्यांशी तोंड देत आहे. यामुळे शेकडो टेक ऑफ काही तास उशिराने किंवा रद्द करण्यात आली आहेत. गेल्या 24 तासांत 550 हून प्लेन टेकऑफ रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका गायक राहुल वैद्यला देखील बसला. 
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्स गेल्या तीन दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल समस्यांशी तोंड देत आहे. यामुळे शेकडो टेक ऑफ काही तास उशिराने किंवा रद्द करण्यात आली आहेत. गेल्या 24 तासांत 550 हून प्लेन टेकऑफ रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका गायक राहुल वैद्यला देखील बसला.
advertisement
6/9
न्यूज 18 लोकमतशी बोलताना राहुलने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणाला,
न्यूज 18 लोकमतशी बोलताना राहुलने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणाला, "दुपारी 1.15 ची फ्लाइट होती आणि संध्याकाळी कलकत्त्याला शो होता. मला काही करून पोहोचायचं होतं. एक तास आधी फ्लाइट पोस्टपोन झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या एअरपोर्टला गेलो. तिथे एअर इंडियाची फ्लाइट फुल होती. त्यांना रिक्वेस्ट करून, जी किंमत असेल त्याचं तिकिट द्या. एक इकोनॉमी तिकिट 40 हजार रुपये, बिझनेसक्लास तिकिट 70 हजार रुपये. इंडिगोसारखा मार्केट लीडर इतकं अनप्रोफेशनल कसं वागू शकतं, प्रवाशांना इतकं गृहीत कसं धरू शकतं हे मला कळत नाही. मी सध्या कामात असून मला वेळ मिळाल्यानंतर मी नक्कीच याची तक्रार करणार आहे."
advertisement
7/9
राहुल रात्री 10 वाजता कोलकत्ताला पोहोचला रात्री 11 वाजता त्याने स्टेज शो केला. रात्री 1 वाजता शो संपला. त्यानंतर 1.40 ला तो पुन्हा एअरपोर्टवर आला. त्याने त्याच्या पोस्टमधून कोलकत्ताच्या शॉर्ट स्टेची माहिती दिली.
राहुल रात्री 10 वाजता कोलकत्ताला पोहोचला रात्री 11 वाजता त्याने स्टेज शो केला. रात्री 1 वाजता शो संपला. त्यानंतर 1.40 ला तो पुन्हा एअरपोर्टवर आला. त्याने त्याच्या पोस्टमधून कोलकत्ताच्या शॉर्ट स्टेची माहिती दिली.
advertisement
8/9
दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला आहे. तातडीच्या प्रवासाच्या गरजा असलेल्या प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या विमान संकटामुळे सेलिब्रिटींनाही त्रास झाला आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.
दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला आहे. तातडीच्या प्रवासाच्या गरजा असलेल्या प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या विमान संकटामुळे सेलिब्रिटींनाही त्रास झाला आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.
advertisement
9/9
या संपूर्ण प्रकारावर इंडिगोने माफी मागितली. इंडिगोने गुरुवारी रात्री उशिरा अधिकृत निवेदन जारी केले. त्यांनी म्हटलं,
या संपूर्ण प्रकारावर इंडिगोने माफी मागितली. इंडिगोने गुरुवारी रात्री उशिरा अधिकृत निवेदन जारी केले. त्यांनी म्हटलं, "आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना आणि भागधारकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून माफी मागतो. आमचे पथक लवकरात लवकर सामान्यीकरण पुनर्संचयित करण्यासाठी MoCA, DGCA, BCAS, AAI आणि विमानतळ ऑपरेटर्ससोबत काम करत आहेत."
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement