शूटिंगला एकत्र, रात्रभर सेटवर सोबत; धर्मेंद्रपासून हेमा मालिनीला वेगळं करण्यासाठी वडिलांनी जंग जंग पछाडलं पण...

Last Updated:
Dharmendra-Hema Malini Affair: धर्मेंद्रसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हेमा मालिनी यांच्या घरात खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांचे वडील खूप घाबरले होते.
1/9
मुंबई: बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी आजही एक आदर्श कपल म्हणून ओळखली जाते. ५ दशकांहून अधिक काळ त्यांनी एकमेकांची साथ दिली असली, तरी त्यांची ही प्रेमकथा खूप नाट्यमय आणि चढ-उतारांनी भरलेली होती.
मुंबई: बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी आजही एक आदर्श कपल म्हणून ओळखली जाते. ५ दशकांहून अधिक काळ त्यांनी एकमेकांची साथ दिली असली, तरी त्यांची ही प्रेमकथा खूप नाट्यमय आणि चढ-उतारांनी भरलेली होती.
advertisement
2/9
हेमा मालिनी यांनी आपल्या आत्मचरित्र 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' मध्ये त्यांच्या अफेअरमुळे घरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल आणि वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल मोठा खुलासा केला आहे. हेमा मालिनींनी कबूल केले की, सुरुवातीला त्यांना धर्मेंद्र यांच्याबद्दल आकर्षण वाटत होते, पण त्यांच्या नात्याला कोणतेही भविष्य नाही हे त्यांना माहीत होते.
हेमा मालिनी यांनी आपल्या आत्मचरित्र 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' मध्ये त्यांच्या अफेअरमुळे घरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल आणि वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल मोठा खुलासा केला आहे. हेमा मालिनींनी कबूल केले की, सुरुवातीला त्यांना धर्मेंद्र यांच्याबद्दल आकर्षण वाटत होते, पण त्यांच्या नात्याला कोणतेही भविष्य नाही हे त्यांना माहीत होते.
advertisement
3/9
हेमा यांनी लिहिले आहे,
हेमा यांनी लिहिले आहे, "सुरुवातीला आम्ही फक्त चांगले मित्र होतो. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. लवकरच, दरवेळी एकमेकांसोबत राहणे ही आमची सवय बनली. वेळेनुसार, नात्याला कोणतीही व्याख्या देणे कठीण होत गेले."
advertisement
4/9
त्यांनी पुढे लिहिले,
त्यांनी पुढे लिहिले, "खरं सांगायचं तर, मी त्यांच्याशी लग्न करण्याचा कधीच विचार केला नव्हता. मला त्यांच्या प्रेमात पडायचे नव्हते. मी नेहमी विचार करायची की, मी ज्याच्याशी लग्न करेन तो त्यांच्यासारखा असावा, पण ते धर्मेंद्रच असतील, याचा कधी विचार केला नव्हता. हे माझे भाग्य आहे."
advertisement
5/9
धर्मेंद्रसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हेमा मालिनी यांच्या घरात खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांचे वडील खूप घाबरले होते. हेमा मालिनींनी बायोग्राफीत सांगितले की,
धर्मेंद्रसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हेमा मालिनी यांच्या घरात खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांचे वडील खूप घाबरले होते. हेमा मालिनींनी बायोग्राफीत सांगितले की, "तेव्हा मासिके आमच्या अफेअरच्या बातम्यांनी भरलेली होती. पत्रकार सतत काहीतरी लिहित होते, ज्यामुळे घरातील शांतता भंग झाली आणि तणाव वाढत गेला."
advertisement
6/9
त्यावेळी परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून हेमा यांच्या वडिलांनी अचानक घाबरून घरी ज्योतिषी आणि पंडितांना बोलावणे सुरू केले. त्यांना हेमा यांच्या कुंडलीत काय आहे, हे जाणून घ्यायचे होते. त्यांच्या लग्नाला होणारा उशीर त्यांना सतावत होता. याच तणावामुळे वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच शूटिंगवर माझ्यासोबत जायला सुरुवात केली, असेही त्यांनी सांगितले.
त्यावेळी परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून हेमा यांच्या वडिलांनी अचानक घाबरून घरी ज्योतिषी आणि पंडितांना बोलावणे सुरू केले. त्यांना हेमा यांच्या कुंडलीत काय आहे, हे जाणून घ्यायचे होते. त्यांच्या लग्नाला होणारा उशीर त्यांना सतावत होता. याच तणावामुळे वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच शूटिंगवर माझ्यासोबत जायला सुरुवात केली, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
7/9
१९७५ मध्ये 'चरस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगताना हेमा यांनी सांगितले की, वडील त्यांना धर्मेंद्र यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे.
१९७५ मध्ये 'चरस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगताना हेमा यांनी सांगितले की, वडील त्यांना धर्मेंद्र यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे.
advertisement
8/9
हेमा यांनी लिहिले,
हेमा यांनी लिहिले, "आऊटडोअर शूटिंगदरम्यान ते माल्टामध्ये अनेक आठवडे राहायचे होते. धर्मेंद्र यांच्यासोबत शूटिंग असल्याने वडिलांनी सोबत येण्याचा हट्ट धरला. कारमध्ये प्रवास करताना ते धर्मेंद्र यांना समजू नये म्हणून तमिळमध्ये मला सांगायचे की, मी एका कोपऱ्यात बसावे आणि ते आमच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करायचे. पण धर्मेंद्रजी नेहमी कोणतीतरी युक्ती शोधून काढायचे."
advertisement
9/9
वडिलांना धर्मेंद्र यांच्याबद्दल कोणतीही अडचण नव्हती, पण हेमा यांचे नाव त्यांच्याशी जोडले जात होते, याचा त्यांना त्रास होता. अखेरीस, १९८० मध्ये हेमा मालिनी यांनी विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले.
वडिलांना धर्मेंद्र यांच्याबद्दल कोणतीही अडचण नव्हती, पण हेमा यांचे नाव त्यांच्याशी जोडले जात होते, याचा त्यांना त्रास होता. अखेरीस, १९८० मध्ये हेमा मालिनी यांनी विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement