रोज नाश्त्यामध्ये तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग यापद्धतीनं बनवा पौष्टिक थालीपीठ
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते.
थालपीठ हा पश्चिम भारत आणि उत्तर कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. परंतु लोणी आणि दह्याबरोबर छान लागते. बीड मधील गृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.
advertisement
सध्याचा काळ हा फास्टफूडचा मानला जातो. अनेकजण नाश्त्यातही तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात. त्यांच्यासाठी अस्सल गावरान आणि पारंपरिक असणारे थालीपीठ एक चांगला पर्याय आहे. स्वादिष्ट आणि बनवायला सोपी असणारी थालीपीठाची रेसिपी आपण घरात सहज बनवू शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा पदार्थ पोषक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement