विदर्भात उष्णतेचा पारा घसरला, 2 जिल्ह्यांत तापमानात मोठी घट, आजचं अपडेट

Last Updated:
Weather Forecast: राज्यात विविध ठिकाणी आता थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. विदर्भातही मंगळवारपासून थंडीचा कडाका वाढण्यास सुरवात झाली आहे. चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांत तापमानाचा पारा घसरला आहे.
1/5
विदर्भात सध्या कोरडे हवामान बघायला मिळत आहे. पुढील काही दिवस पावसाची कुठलीही शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घट होतांना दिसून येत आहे.
विदर्भात सध्या कोरडे हवामान बघायला मिळत आहे. पुढील काही दिवस पावसाची कुठलीही शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घट होतांना दिसून येत आहे.
advertisement
2/5
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअस इतके आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवायला सुरवात होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे.
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअस इतके आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवायला सुरवात होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे.
advertisement
3/5
अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांतील किमान तापमानात फारशी घट नाही. येथील किमान तापमान हे 20 अंश सेल्सिअस ते 21 अंश सेल्सिअस इतके असून कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस इतके आहे.
अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांतील किमान तापमानात फारशी घट नाही. येथील किमान तापमान हे 20 अंश सेल्सिअस ते 21 अंश सेल्सिअस इतके असून कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस इतके आहे.
advertisement
4/5
विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला, वाशिम शहरांमध्ये सकाळी हलकी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. विदर्भात अजूनही काही ठिकाणी हवामानाची विचित्र स्थिती बघायला मिळत आहे.
विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला, वाशिम शहरांमध्ये सकाळी हलकी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. विदर्भात अजूनही काही ठिकाणी हवामानाची विचित्र स्थिती बघायला मिळत आहे.
advertisement
5/5
आतापर्यंत शेतकरी सोयाबीन आणि कपाशीमुळे चिंतेत होता. आता ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बदलत्या वातावरणामुळे आता आरोग्याच्या समस्या देखील विदर्भात जास्त उद्भवत आहे. ती देखील काळजी घेणे आवश्यक आहे. 
आतापर्यंत शेतकरी सोयाबीन आणि कपाशीमुळे चिंतेत होता. आता ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बदलत्या वातावरणामुळे आता आरोग्याच्या समस्या देखील विदर्भात जास्त उद्भवत आहे. ती देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement