Mumbai Rain: सावधान! मुंबई, ठाण्यात पावसाचं तुफान, 72 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून हायअलर्ट!

Last Updated:
Mumbai Rain: कोकण किनारपट्टीवर पावसाचं थैमान सुरू असून आज पुन्हा मुंबईसह सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे.
1/5
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे उशीर, आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून मुसळधार पावसाने अक्षरशः शहरं ठप्प केली. आजही म्हणजे 17 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाच्या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे उशीर, आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून मुसळधार पावसाने अक्षरशः शहरं ठप्प केली. आजही म्हणजे 17 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाच्या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
मुंबईत दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. शनिवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे आजही नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. तापमान कमाल 30 अंश तर किमान 25 अंश राहील, वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. शनिवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे आजही नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. तापमान कमाल 30 अंश तर किमान 25 अंश राहील, वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाची पुनरावृत्ती आजही होऊ शकते. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या भागात दिवसभर हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज असून, तापमान 24 ते 29 अंश सेल्सिअसदरम्यान राहील.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाची पुनरावृत्ती आजही होऊ शकते. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या भागात दिवसभर हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज असून, तापमान 24 ते 29 अंश सेल्सिअसदरम्यान राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून या भागाला ऑरेंज अलर्ट लागू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे पालघर शहरासह ग्रामीण भागात पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून ठिकठिकाणी जोरदार सरींचा अनुभव येईल.
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून या भागाला ऑरेंज अलर्ट लागू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे पालघर शहरासह ग्रामीण भागात पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून ठिकठिकाणी जोरदार सरींचा अनुभव येईल.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील आज ऑरेंज अलर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सुरू असून नद्यांमध्ये पाणीपातळी वाढली आहे. आज दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील आज ऑरेंज अलर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सुरू असून नद्यांमध्ये पाणीपातळी वाढली आहे. आज दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement