Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात हवापालट, धो धो बंद, आता श्रावण सरी, मंगळवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: गेले काही दिवस मुंबईसह कोकणात पावसाचा जोर राहिला. आता मात्र हवापालट होण्याची शक्यता असून हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
1/5
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील वाहतूक, लोकल सेवा यावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आज 29 जुलै रोजी, हवामानात काहीसा बदल पाहायला मिळतोय. मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील वाहतूक, लोकल सेवा यावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आज 29 जुलै रोजी, हवामानात काहीसा बदल पाहायला मिळतोय. मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
advertisement
2/5
मुंबईत गेले 3 -4 दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते, लोकल उशिराने धावत होत्या आणि वाहतूक ठप्प झाली होती. पण आज मात्र आकाश काहीसं निरभ्र राहील, फक्त हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहणार असून वातावरण दमट राहील, पण मुसळधार पावसाचा धोका नाही.
मुंबईत गेले 3 -4 दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते, लोकल उशिराने धावत होत्या आणि वाहतूक ठप्प झाली होती. पण आज मात्र आकाश काहीसं निरभ्र राहील, फक्त हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहणार असून वातावरण दमट राहील, पण मुसळधार पावसाचा धोका नाही.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे शहरातही आज हवामान तुलनेत स्थिर राहण्याचा अंदाज आहे. या भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, मात्र वादळी वाऱ्यांचा किंवा अतिवृष्टीचा धोका नाही. तापमान 24 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तेवढ्यापुरताच प्रवास करावा, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नवी मुंबई आणि ठाणे शहरातही आज हवामान तुलनेत स्थिर राहण्याचा अंदाज आहे. या भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, मात्र वादळी वाऱ्यांचा किंवा अतिवृष्टीचा धोका नाही. तापमान 24 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तेवढ्यापुरताच प्रवास करावा, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज वातावरण तुलनेने शांत राहणार आहे. एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी, संपूर्ण जिल्ह्यासाठी कोणताही हवामान अलर्ट दिलेला नाही. तापमान 24 ते 29 अंशांच्या दरम्यान राहील. मागील काही दिवसांपेक्षा आजचा दिवस सौम्य आणि आरामदायक जाण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात आज वातावरण तुलनेने शांत राहणार आहे. एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी, संपूर्ण जिल्ह्यासाठी कोणताही हवामान अलर्ट दिलेला नाही. तापमान 24 ते 29 अंशांच्या दरम्यान राहील. मागील काही दिवसांपेक्षा आजचा दिवस सौम्य आणि आरामदायक जाण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
दुसरीकडे कोकणात, विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये विशेष सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र कोणताही अधिकृत अलर्ट नाही, पण आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कोकणात, विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये विशेष सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र कोणताही अधिकृत अलर्ट नाही, पण आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement