Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात हवापालट, धो धो बंद, आता श्रावण सरी, मंगळवारचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: गेले काही दिवस मुंबईसह कोकणात पावसाचा जोर राहिला. आता मात्र हवापालट होण्याची शक्यता असून हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
advertisement
मुंबईत गेले 3 -4 दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते, लोकल उशिराने धावत होत्या आणि वाहतूक ठप्प झाली होती. पण आज मात्र आकाश काहीसं निरभ्र राहील, फक्त हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहणार असून वातावरण दमट राहील, पण मुसळधार पावसाचा धोका नाही.
advertisement
नवी मुंबई आणि ठाणे शहरातही आज हवामान तुलनेत स्थिर राहण्याचा अंदाज आहे. या भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, मात्र वादळी वाऱ्यांचा किंवा अतिवृष्टीचा धोका नाही. तापमान 24 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तेवढ्यापुरताच प्रवास करावा, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
advertisement
दुसरीकडे कोकणात, विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये विशेष सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र कोणताही अधिकृत अलर्ट नाही, पण आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.


