Mumbai Weather: मुंबईतील हवामानात पुन्हा बदल, कोकणाला पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
गेल्या आठवडाभर पावसाने नुसतं थैमान घातलं होतं. अनेक ठिकाणी रस्ते जलमय, लोकल सेवा विस्कळीत, आणि शाळांना सुट्टी अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
गेल्या आठवडाभर पावसाने नुसतं थैमान घातलं होतं. अनेक ठिकाणी रस्ते जलमय, लोकल सेवा विस्कळीत, आणि शाळांना सुट्टी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण या आठवड्याची सुरुवात मात्र तुलनेने सौम्य पावसाने होत आहे. मुंबईत आज रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित ठिकाणी फारसा धोका नाही. यामुळे या आठवड्यातील पावसाचं वातावरण काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलकं-फुलकं रिमझिम असं दिसून येईल.
advertisement
मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या रिमझिम सरी पडतील. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाची तीव्रता कमी असेल, पण अधूनमधून अचानक जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तापमान 27 अंश सेल्शिअस ते 31 अंश सेल्शिअस दरम्यान राहील, तर आर्द्रता जास्त असल्यामुळे उकाड्याची भावना होईल. वाऱ्याचा वेग सुमारे 25-30 किमी प्रतितास राहील.
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. येथे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र तुलनेने हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या भागात समुद्राला भरती येऊ शकते त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला आहे.


