खरंच! जेवढे गणपतीचे फोटो किंवा स्टॅचू घरात जास्त, तेवढाच त्रास जास्त, काय सांगतात वास्तूतज्ज्ञ?

Last Updated:
भारतीय घरांमध्ये गणपती बाप्पाला 'सुखकर्ता' आणि 'दुःखहर्ता' मानले जाते. घराच्या सजावटीसाठी किंवा श्रद्धेपोटी अनेक लोक घराच्या प्रत्येक खोलीत गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीच्या मूर्तींची संख्या मर्यादित असणे आवश्यक आहे.
1/7
भारतीय घरांमध्ये गणपती बाप्पाला 'सुखकर्ता' आणि 'दुःखहर्ता' मानले जाते. घराच्या सजावटीसाठी किंवा श्रद्धेपोटी अनेक लोक घराच्या प्रत्येक खोलीत गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीच्या मूर्तींची संख्या मर्यादित असणे आवश्यक आहे. जर मूर्तींची संख्या गरजेपेक्षा जास्त झाली किंवा त्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या, तर घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी तणाव आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. गोष्ट फायद्याची या चॅनेलला मुलाखत देताना गणेश कुंभार यांनी एकापेक्षा जास्त मुर्त्या घरात असतील तर काय परिणाम होतो हे स्पष्ट केलं आहे.
भारतीय घरांमध्ये गणपती बाप्पाला 'सुखकर्ता' आणि 'दुःखहर्ता' मानले जाते. घराच्या सजावटीसाठी किंवा श्रद्धेपोटी अनेक लोक घराच्या प्रत्येक खोलीत गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीच्या मूर्तींची संख्या मर्यादित असणे आवश्यक आहे. जर मूर्तींची संख्या गरजेपेक्षा जास्त झाली किंवा त्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या, तर घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी तणाव आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. गोष्ट फायद्याची या चॅनेलला मुलाखत देताना गणेश कुंभार यांनी एकापेक्षा जास्त मुर्त्या घरात असतील तर काय परिणाम होतो हे स्पष्ट केलं आहे.
advertisement
2/7
ऊर्जेचा समतोल बिघडतो: वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक मूर्तीमधून एक विशिष्ट ऊर्जा उत्सर्जित होत असते. जेव्हा एकाच घरात किंवा एकाच ठिकाणी अनेक गणेशमूर्ती असतात, तेव्हा त्यांच्या लहरी एकमेकांवर आदळतात. यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते आणि सदस्यांच्या मनात विनाकारण द्विधा मनस्थिती निर्माण होते.
ऊर्जेचा समतोल बिघडतो: वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक मूर्तीमधून एक विशिष्ट ऊर्जा उत्सर्जित होत असते. जेव्हा एकाच घरात किंवा एकाच ठिकाणी अनेक गणेशमूर्ती असतात, तेव्हा त्यांच्या लहरी एकमेकांवर आदळतात. यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते आणि सदस्यांच्या मनात विनाकारण द्विधा मनस्थिती निर्माण होते.
advertisement
3/7
'रिद्धी-सिद्धी' आणि 'शुभ-लाभ' यांचा प्रभाव: असे मानले जाते की, घराच्या मुख्य मंदिरात गणपतीची फक्त एकच मूर्ती असावी. एकापेक्षा जास्त मूर्ती असल्यास 'रिद्धी-सिद्धी' आणि 'शुभ-लाभ' यांचा प्रभाव क्षीण होतो, असे शास्त्र सांगते. यामुळे घरात पैसा न टिकणे किंवा कामात शेवटच्या क्षणी अडथळे येणे असे अनुभव येऊ शकतात.
'रिद्धी-सिद्धी' आणि 'शुभ-लाभ' यांचा प्रभाव: असे मानले जाते की, घराच्या मुख्य मंदिरात गणपतीची फक्त एकच मूर्ती असावी. एकापेक्षा जास्त मूर्ती असल्यास 'रिद्धी-सिद्धी' आणि 'शुभ-लाभ' यांचा प्रभाव क्षीण होतो, असे शास्त्र सांगते. यामुळे घरात पैसा न टिकणे किंवा कामात शेवटच्या क्षणी अडथळे येणे असे अनुभव येऊ शकतात.
advertisement
4/7
उपासनेत एकाग्रतेचा अभाव: जेव्हा घरामध्ये अनेक गणपती असतात, तेव्हा कोणत्या मूर्तीची मनोभावे पूजा करावी, याबाबत गोंधळ उडू शकतो. अध्यात्मात एकाग्रतेला महत्त्व आहे. एकच मूर्ती असेल तर त्यावर भक्ती केंद्रित होते. जास्त मूर्ती केवळ 'शो-पीस' ठरल्यास त्यांचा अपमान होऊ शकतो, जो वास्तूदोष मानला जातो.
उपासनेत एकाग्रतेचा अभाव: जेव्हा घरामध्ये अनेक गणपती असतात, तेव्हा कोणत्या मूर्तीची मनोभावे पूजा करावी, याबाबत गोंधळ उडू शकतो. अध्यात्मात एकाग्रतेला महत्त्व आहे. एकच मूर्ती असेल तर त्यावर भक्ती केंद्रित होते. जास्त मूर्ती केवळ 'शो-पीस' ठरल्यास त्यांचा अपमान होऊ शकतो, जो वास्तूदोष मानला जातो.
advertisement
5/7
सोंडेच्या दिशेचे नियम: घरासाठी नेहमी 'डाव्या' बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते. जर तुमच्या संग्रहात उजव्या सोंडेचे अनेक गणपती असतील, तर त्यांची पूजा करण्याचे नियम अत्यंत कडक असतात. या नियमांचे पालन न झाल्यास घरात मानसिक अशांती वाढू शकते.
सोंडेच्या दिशेचे नियम: घरासाठी नेहमी 'डाव्या' बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते. जर तुमच्या संग्रहात उजव्या सोंडेचे अनेक गणपती असतील, तर त्यांची पूजा करण्याचे नियम अत्यंत कडक असतात. या नियमांचे पालन न झाल्यास घरात मानसिक अशांती वाढू शकते.
advertisement
6/7
मुख्य दरवाजा आणि समोरासमोर मूर्ती: अनेकांना मुख्य दरवाजावर गणपती लावण्याची आवड असते. मात्र, गणपतीची पाठ ज्या खोलीकडे असते, तिथे दारिद्र्य येते असे मानले जाते. जर तुम्ही दोन मूर्ती अशा लावल्या की त्यांचे तोंड एकमेकांकडे आहे किंवा पाठ एकमेकांकडे आहे, तर तो मोठा वास्तू दोष मानला जातो.
मुख्य दरवाजा आणि समोरासमोर मूर्ती: अनेकांना मुख्य दरवाजावर गणपती लावण्याची आवड असते. मात्र, गणपतीची पाठ ज्या खोलीकडे असते, तिथे दारिद्र्य येते असे मानले जाते. जर तुम्ही दोन मूर्ती अशा लावल्या की त्यांचे तोंड एकमेकांकडे आहे किंवा पाठ एकमेकांकडे आहे, तर तो मोठा वास्तू दोष मानला जातो.
advertisement
7/7
घरामध्ये श्रद्धेपोटी गणपती असणे उत्तम आहे, पण त्यांची संख्या 1 ते 3 पेक्षा जास्त नसावी. जर तुमच्याकडे भेट म्हणून मिळालेल्या अनेक मूर्ती असतील, तर त्यातील एक मुख्य मंदिरात ठेवा आणि इतर मूर्तींची जागा दिशा पाहून निश्चित करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
घरामध्ये श्रद्धेपोटी गणपती असणे उत्तम आहे, पण त्यांची संख्या 1 ते 3 पेक्षा जास्त नसावी. जर तुमच्याकडे भेट म्हणून मिळालेल्या अनेक मूर्ती असतील, तर त्यातील एक मुख्य मंदिरात ठेवा आणि इतर मूर्तींची जागा दिशा पाहून निश्चित करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement