या खास रत्नांना धारण करताच पालटत नशीब, पण चुकीच्या वेळी घातल्यास होत मोठं नुकसान!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, ही रत्ने ग्रहांची ऊर्जा शोषून ती आपल्या शरीरात प्रवाहित करतात. योग्य रत्न धारण केल्यास आयुष्यातील संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
1/7
ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, ही रत्ने ग्रहांची ऊर्जा शोषून ती आपल्या शरीरात प्रवाहित करतात. योग्य रत्न धारण केल्यास आयुष्यातील संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. मात्र, रत्ने ही दुधारी तलवारीसारखी असतात; ती विधीवत आणि योग्य सल्ल्याने घातली तरच लाभ देतात, अन्यथा मोठे नुकसानही होऊ शकते.
ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, ही रत्ने ग्रहांची ऊर्जा शोषून ती आपल्या शरीरात प्रवाहित करतात. योग्य रत्न धारण केल्यास आयुष्यातील संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. मात्र, रत्ने ही दुधारी तलवारीसारखी असतात; ती विधीवत आणि योग्य सल्ल्याने घातली तरच लाभ देतात, अन्यथा मोठे नुकसानही होऊ शकते.
advertisement
2/7
माणिक - सूर्याचे रत्न: माणिक हे ग्रहांचा राजा 'सूर्य' याचे रत्न आहे. हे रत्न धारण केल्याने समाजात मान-सन्मान, नेतृत्व गुण आणि सरकारी कामात यश मिळते. माणिक नेहमी सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत जडवून अनामिका बोटात घालावे. ते रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी धारण करणे सर्वोत्तम असते.
माणिक - सूर्याचे रत्न: माणिक हे ग्रहांचा राजा 'सूर्य' याचे रत्न आहे. हे रत्न धारण केल्याने समाजात मान-सन्मान, नेतृत्व गुण आणि सरकारी कामात यश मिळते. माणिक नेहमी सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत जडवून अनामिका बोटात घालावे. ते रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी धारण करणे सर्वोत्तम असते.
advertisement
3/7
नीलम - शनीचे रत्न: नीलम हे शनीचे सर्वात शक्तिशाली आणि तत्काळ फळ देणारे रत्न आहे. हे रत्न रंकाचा राव आणि रावाचा रंक करण्याची क्षमता ठेवते. नीलम नेहमी चांदी किंवा पंचधातूच्या अंगठीत मध्यमा बोटात शनिवारी धारण करावे. हे रत्न घालण्यापूर्वी त्याची चाचणी करणे अनिवार्य आहे.
नीलम - शनीचे रत्न: नीलम हे शनीचे सर्वात शक्तिशाली आणि तत्काळ फळ देणारे रत्न आहे. हे रत्न रंकाचा राव आणि रावाचा रंक करण्याची क्षमता ठेवते. नीलम नेहमी चांदी किंवा पंचधातूच्या अंगठीत मध्यमा बोटात शनिवारी धारण करावे. हे रत्न घालण्यापूर्वी त्याची चाचणी करणे अनिवार्य आहे.
advertisement
4/7
पुष्कराज - गुरूचे रत्न: पुष्कराज हे देवगुरु बृहस्पतीचे रत्न असून ते ज्ञान, संपत्ती आणि वैवाहिक सुखासाठी ओळखले जाते. ज्यांच्या लग्नात अडथळे येत आहेत, त्यांच्यासाठी हे वरदान ठरते. पुष्कराज नेहमी सोन्याच्या अंगठीत तर्जनी बोटात गुरुवारी सकाळी धारण करावा.
पुष्कराज - गुरूचे रत्न: पुष्कराज हे देवगुरु बृहस्पतीचे रत्न असून ते ज्ञान, संपत्ती आणि वैवाहिक सुखासाठी ओळखले जाते. ज्यांच्या लग्नात अडथळे येत आहेत, त्यांच्यासाठी हे वरदान ठरते. पुष्कराज नेहमी सोन्याच्या अंगठीत तर्जनी बोटात गुरुवारी सकाळी धारण करावा.
advertisement
5/7
शुद्धीकरणाची प्रक्रिया: कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ते गंगाजल आणि कच्च्या दुधात काही वेळ ठेवून शुद्ध करावे. त्यानंतर संबंधित ग्रहाच्या मंत्राचा 108 वेळा जप करूनच ते परिधान करावे.
शुद्धीकरणाची प्रक्रिया: कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ते गंगाजल आणि कच्च्या दुधात काही वेळ ठेवून शुद्ध करावे. त्यानंतर संबंधित ग्रहाच्या मंत्राचा 108 वेळा जप करूनच ते परिधान करावे.
advertisement
6/7
वजनाचे महत्त्व: रत्नाचे फळ मिळण्यासाठी त्याचे वजन योग्य असणे गरजेचे आहे. सहसा शरीराच्या वजनाच्या 1/10 भाग रत्न असावे, असे शास्त्र सांगते. मात्र, ज्योतिषाच्या सल्ल्यानेच वजन निश्चित करावे.
वजनाचे महत्त्व: रत्नाचे फळ मिळण्यासाठी त्याचे वजन योग्य असणे गरजेचे आहे. सहसा शरीराच्या वजनाच्या 1/10 भाग रत्न असावे, असे शास्त्र सांगते. मात्र, ज्योतिषाच्या सल्ल्यानेच वजन निश्चित करावे.
advertisement
7/7
रत्नांचे परस्पर संबंध: रत्ने एकत्र घालताना काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, नीलमसोबत माणिक, मोती किंवा पोवळे कधीही घालू नये, कारण शनी आणि सूर्य/चंद्र यांच्यात शत्रुत्व आहे. चुकीच्या संयोगामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
रत्नांचे परस्पर संबंध: रत्ने एकत्र घालताना काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, नीलमसोबत माणिक, मोती किंवा पोवळे कधीही घालू नये, कारण शनी आणि सूर्य/चंद्र यांच्यात शत्रुत्व आहे. चुकीच्या संयोगामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement