IND vs NZ : गंभीरने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली, तीन निर्णयामुळे मालिका गमावली, जगभर नाचक्की झाली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 41 धावांनी पराभव केला होता. या विजयासह न्यूझीलंडने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली.
advertisement
advertisement
advertisement
पहिले कारण न्यूझीलंड विरूद्ध रवींद्र जडेजाला ऑलराऊंडर म्हणून संघात खेळवलं होतं. मात्र या सामन्यात त्याला फक्त 4,27 आणि 12च धावा केल्या होत्या.विशेष म्हणजे रविंद्र जडेजा फलंदाजीत तर फ्लॉप ठरलाच त्याचसोबत त्याला गोलंदाजीतही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे रविंद्र जडेजा सारखाच अक्षऱ पटेलच्या रूपात रिप्लेसमेंट आहे,तो टी20 चा उप कर्णधार देखील आहे. अशापरिस्थितीता त्याला वनडे फॉरमॅटमध्ये न खेळवणे हे समजण्यापलिकडे आहे.
advertisement
advertisement
advertisement
तिसरं कारण वरूण चक्रवर्ती आणि अर्शदिप सिंह हे दोन्ही खेळाडू खूप चांगली गोलंदाजी करतात. पण गौतम गंभीरला हे दोन्ही खेळाडू वनडे फॉरमॅट खेळ शतक नाही असे वाटते. तसेच प्रत्येकवेळी एखादा गोलंदाज निवडताना त्याची फलंदाजी का तपासली जाते? मोहम्मद सिराज आणि बुमराह या दौघांपैकी एकाला संघात सामील केले गेले पाहिजे.








