Ranji Trophy : 30 कोटीच्या तीन धाकड खेळाडूंना पव्हेलियन रस्ता दाखवला, कोण आहे Parth Rekhade?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई अजून विदर्भापासून 150 धावा दूर आहे. आणि त्यांच्या हातात अजून 3 विकेट आहेत. त्यामुळे आता विदर्भ मुंबईला ऑल आऊट करण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
advertisement
दरम्यान आयपीएलसमध्ये या तीनही खेळाडूंना कोटींची बोली लागली आहे. कोलकत्ताने अजिंक्य रहाणे 1.5 करोड खरेदी केले आहे. सुर्यकुमार यादवला 16.35 करोड रूपयांना खरेदी करत मुंबईने संघात कायम ठेवले.तर चेन्नईमे 12 करोडला शिवम दुबे संघात कायम केले. त्यामुळे आयपीएलमध्ये भाव खाऊन जाणाऱ्या खेळाडूंना पार्थने आऊट केले आहे.
advertisement
दरम्यान डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ रेखाडेने एका षटकात तीन बळी घेतल्याने विदर्भाने मंगळवारी गतविजेत्या मुंबईविरुद्ध रणजी करंडक उपांत्य फेरीसाठी आपले स्थान मजबूत केले. विदर्भाच्या 383 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर पहिल्या डावात 7 बाद 188 धावा केल्या आहेत आणि ते अजूनही 195 धावांनी मागे आहेत.
advertisement
advertisement