'या' मंदिरात भिक्षा ग्रहण करण्यासाठी येतात गुरुदेव दत्त; पाहा काय सांगितली जाते महती Video

Last Updated:

श्री दत्त महाराज भिक्षेला करवीरात येतात आणि या मंदिर परिसरात भिक्षा ग्रहण करतात, असे या मंदिराची महती सांगितली जाते.

+
News18

News18

कोल्हापूर, 26 डिसेंबर : कोल्हापूर अर्थात करवीर हे स्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. अनेक प्राचीन मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात. यातच एक महत्त्वाचे दत्त स्थान असणाऱ्या श्री एकवीरा दत्त भिक्षालिंग मंदिराला देखील एक विशेष महत्त्व आहे. श्री दत्त महाराज भिक्षेला करवीरात येतात आणि याच श्री दत्त भिक्षालिंग मंदिर परिसरात भिक्षा ग्रहण करतात, असे या मंदिराची महती सांगितली जाते.
श्री दत्त महाराजांच्या गिरनार, माहुरगड आणि करवीर या तीन महत्वाच्या ठिकाणांपैकी करवीर हे भिक्षा स्थान आहे. गुरुचरित्रातील एका अध्यायामध्ये असणारा करवीर भिक्षा असा उल्लेख करवीर नगरीशी निगडित आहे. या दत्त मंदिराच्या शेजारीच एकवीरा देवीचे मंदिर आहे. श्री नागनाथ महाराजांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदीरामध्ये श्री दत्त महाराजांच्या भेटीसाठी अन्नछत्र चालू केले. जे सिद्धीचे अन्न घेत नाहीत ते दत्त महाराज असे मानतात. त्यावेळी श्री दत्त महाराजांना एकवीरा देवीने भिक्षा दिली, म्हणून हे भिक्षास्थान मानले जाते. श्री गुरुदेव दत्तांना शोधत नागनाथ महाराज दुपारी 12 वाजता या भिक्षालिंग स्थानावर आले असल्याची माहीती देखील नवनाथ ग्रंथामध्ये पाहायला मिळते, अशी माहिती मंदिराचे पुजारी पुरोहित बाळासो दादर्णे यांनी दिली आहे.
advertisement
गुरू चरित्रात देखील आहे वर्णन
या श्री दत्त भिक्षालिंग मंदिराची महती आपल्याला गुरू चरित्रात देखील पाहायला मिळते. श्री दत्त महाराज करवीरात भिक्षेला येतात असे वर्णन गुरू चरित्रात आहे. या मंदिरात असणारे लिंग हे शिवलिंग नसून यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश अशा दत्ताच्या तीनही गुणांची 3 असलेली लिंग या एकाच पिंडीवर स्थापित झालेली आहेत, असे मंदिर रचना आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
advertisement
करवीर म्हणजे दत्तगुरुंचे आजोळ
कपिल मुनींचे वास्तव्य राहिलेले कपिलेश्वर हे स्थान म्हणजे करवीरचे ग्रामदैवत होय. कपिल मुनींची माता देवाहुती आणि पिता कर्दमऋषी यांचेही स्थान हे कपिलेश्वर तलाव या ठिकाणी होते. याच कर्दमऋषी आणि देवाहुती यांची कन्या म्हणजे माता अनुसया. तर माता अनुसया यांचे पुत्र म्हणजेच गुरुदेव दत्त होय. या नात्याने पाहायला गेल्यास करवीर नगरी म्हणजे दत्त प्रभूंचे आजोळ आहे. त्यामुळेच श्री दत्त करवीर क्षेत्री दररोज भिक्षा घेण्यासाठी येतात. तसेच नगराच्या बाहेर येऊन एकवीरेच्या मंदिराजवळ थांबून घेतलेली भिक्षा ग्रहण करतात. अशीही या स्थानाची महती असल्याचे देखील उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
advertisement
असा आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर
कोल्हापुरातील रविवार पेठेत आझाद चौक परिसरात कॉमर्स कॉलेज शेजारी हे श्री दत्त भिक्षालिंग मंदिर आहे. मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला आहे, तर दुसरा मंदिर परिसरात असणाऱ्या एकवीरा देवीच्या मंदिरासमोरून आहे. दत्त मंदिराच्या परिसरात श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती असे फोटो लावण्यात आले आहेत.
advertisement
त्यापुढे मंदिराच्या छताला भेदून गेलेले उंचच उंच उंबराचे झाड पाहायला मिळते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंड आणि श्री गणेश, नागनाथ यांच्या मूर्ती आहेत. दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात समोर मोठी पिंड आणि त्यावर ब्रम्हा, विष्णू, महेश या तिन्ही गुणांची लिंग आहेत. या पिंडीला आकर्षक अशा पाना-फुलांनी सजविण्यात येते. आत गाभाऱ्यात दत्त पादुका देखील आहेत. तर या पिंडीच्या उजव्या बाजूस श्री दत्तात्रयांची उत्सवमुर्ती आणि डाव्या बाजूला छोटी संगमरवरी श्री गहनीनाथ महाराज यांची मुर्ती आहे.
advertisement
ram mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची कोणत्या मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठा? संपूर्ण माहिती
सध्या या मंदिराचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पाहत आहे. दरम्यान दत्तभिक्षालिंग मंदिरात तिन्ही त्रिकाळ आरती होत असते. त्यासोबतच नियमित भजन, पूजन, किर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद देखील मंदीरात होत असतात. मंदिरात दर गुरुवारी पालखी सोहळा पार पडत असतो. तर नारळी पौर्णिमा आणि दत्त जयंतीला मंदिरात विशेष उत्सव सोहळा साजरा केला जातो.
advertisement
पत्ता :
श्री एकवीरा दत्त भिक्षालिंग मंदिर, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स शेजारी, आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर - 416002
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
'या' मंदिरात भिक्षा ग्रहण करण्यासाठी येतात गुरुदेव दत्त; पाहा काय सांगितली जाते महती Video
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement