'मुंबईत मॅच झाली असती तर...', IND vs PAK सामन्याचा वाद पेटला, 5 प्रश्न विचारत संजय राऊतांनी करुन दिली 1991 च्या वानखेडेची आठवण!

Last Updated:

Sanjay Raut Pens to PM Modi : संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत पंतप्रधान मोदींना टोला देखील लगावला अन् 1991 मध्ये शिवसेनेने केल्या धाडसीपणाचा दाखला देखील दिला.

Sanjay Raut Pens to PM modi
Sanjay Raut Pens to PM modi
India vs Pakistan Asia Cup Match : भारत आणि पाकिस्तान आता आशिया कप स्पर्धेमध्ये आमने सामने येणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशामध्ये क्रिकेट खेळली जाईल. अशातच आता याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं असताना संजय राऊत यांनी मोदींना पत्र लिहित टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यांना हिरवा कंदील दिल्याची बातमी भारतातील लोकांसाठी खूप वेदनादायक आहे. पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय हे शक्य होणार नाही हे स्पष्ट आहे, असं संजय राऊत पत्रात म्हणतात. त्यावेळी त्याने सरकारला पाच प्रश्न देखील विचारले आहेत.

संजय राऊतांनी विचारलेले पाच प्रश्न

1. तुम्ही म्हणता की पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर संघर्ष अजूनही चालू असेल तर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळू शकतो?
2. पहलगाम हल्ला एका पाकिस्तानी दहशतवादी गटाने केला होता, ज्याने २६ महिलांचे सिंदूर पुसले होते. तुम्ही त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का?
advertisement
3. जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिली आहे का?
4. तुम्ही घोषित केले की "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही." आता, रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकेल का?
5. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि ऑनलाइन जुगाराचा समावेश आहे, ज्यामध्ये अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. गुजरातमधील एक प्रमुख व्यक्ती जय शाह सध्या क्रिकेटचे कामकाज सांभाळत आहेत. यात भाजपला मोठी आर्थिक उलाढाल होते का?
advertisement
advertisement

1991 च्या धाडसीपणाचा दाखला 

संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत पंतप्रधान मोदींना टोला देखील लगावला अन् 1991 मध्ये शिवसेनेने केल्या धाडसीपणाचा दाखला देखील दिला. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे केवळ आपल्या सैनिकांच्या शौर्याचा अपमान नाही तर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासह काश्मीरसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक शहीदांचाही अपमान आहे. हे सामने दुबईमध्ये होत आहेत. जर ते महाराष्ट्रात झाले असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना अडथळा आणला असता, असं संजय राऊत म्हणाले.
advertisement
दरम्यान, हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा पाकिस्तानसोबत क्रिकेटला प्राधान्य देऊन तुम्ही देशाच्या लोकांच्या भावनांना निरर्थक समजत आहात, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'मुंबईत मॅच झाली असती तर...', IND vs PAK सामन्याचा वाद पेटला, 5 प्रश्न विचारत संजय राऊतांनी करुन दिली 1991 च्या वानखेडेची आठवण!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement