विजय हजारेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही; निवड समिती प्रमुख संजय पाटलांनी दिली मोठी अपडेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Vijay Hazare Trophy: रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव हे विजय हजारे ट्रॉफीच्या कमीत कमी पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीत कारण मुंबईच्या निवड समितीला तरुण खेळाडूंना संधी आहे असे निवड समिती प्रमुखांनी सांगितले.
मुंबई, 19 डिसेंबर: भारतीय खेळाडू रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव हे विजय हजारे ट्रॉफीच्या कमीत कमी पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीत; कारण मुंबईच्या निवड समितीला तरुण खेळाडूंना संधी द्यायची आहे. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे देखील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. मुंबईचे मुख्य निवड समिती प्रमुख संजय पाटील यांनी पीटीआयला ही माहिती दिली.
रोहित, जयस्वाल, दुबे आणि रहाणे हे कमीत कमी पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईच्या संघात असणार नाहीत कारण निवड समिती तरुण संघासोबत पुढे जात आहे. 'यशस्वीला पोटाची समस्या आहे आणि तो लवकरच बरा होईल. आम्ही विचार केला की तरुण खेळाडूंना संधी द्यायला हवी. पण जेव्हा हे खेळाडू उपलब्ध असतील, तेव्हा त्यांना संघात घेतले जाईल.
advertisement
पाटील यांनी पुढे सांगितले, पण पहिल्या दोन सामन्यांसाठी आम्ही तरुण खेळाडूंना संधी देत आहोत. ५० ओव्हरच्या या टूर्नामेंटचा एलिट डिव्हिजन २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि बेंगळुरू येथे होईल. तर १२ ते १८ जानेवारी दरम्यान नॉकआउट सामने बेंगळुरूच्या 'सेंटर ऑफ एक्सीलेंस मध्ये होतील.
मुंबईला ग्रुप सीमध्ये पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा आणि हिमाचल प्रदेशसोबत ठेवण्यात आले आहे. मुंबईचा संघ टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी २४ डिसेंबरला सिक्कीमशी सामना खेळेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 7:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विजय हजारेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही; निवड समिती प्रमुख संजय पाटलांनी दिली मोठी अपडेट









