IND vs AUS : भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्जचं वादळी शतक आणि कर्णधार हरमनप्रीतच्या 89 रनच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचं 339 रनचं आव्हान पार केलं.

भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!
भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!
नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्जचं वादळी शतक आणि कर्णधार हरमनप्रीतच्या 89 रनच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचं 339 रनचं आव्हान पार केलं. महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, पण या पराभवाचा बदला भारताने सेमी फायनलमध्ये घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपमधली पहिलीच मॅच खेळणारी शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून आऊट झाली. यानंतर जेमिमाने स्मृती मंधानाच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण स्मृतीला वादग्रस्त आऊट दिलं गेलं. यानंतर जेमिमाने हरमनप्रीतसोबत 167 रनची पार्टनरशीप केली.

ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर

पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement