जालना : शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे जणू काही प्रयोगशाळाच. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग शेतकरी उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतात करत असतात. जालना जिल्ह्यातील कंडारी येथील एका तरुण शेतकऱ्याने अंजिर शेती यशस्वी केली असून या माध्यमातून त्यांना केवळ 30 गुंठ्यात 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.



