Exclusive: मुंबई-दिल्लीवर हल्ले करा, इस्रायलच्या भीतीने भारताला 'डीफॉल्ट टार्गेट' करण्याचा प्लॅन, पाकिस्तानने ओकली विषारी गरळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Viral Threat: पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या धक्कादायक विधानांमुळे भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.
इस्लामाबाद: सीएनएन-न्यूज18 (CNN-News18) ला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे माजी भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अत्यंत धक्कादायक विधान करत भारतातील शहरांवर थेट लष्करी हल्ले करण्याचे समर्थन केल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध अमेरिका किंवा इस्रायलने कारवाई केल्यास प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य करावे, असे त्यांनी सार्वजनिकरीत्या म्हटले आहे. 2014 ते 2017 दरम्यान नवी दिल्लीमध्ये पाकिस्तानचे सर्वोच्च राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या बसीत यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात भारताला “डीफॉल्ट टार्गेट” म्हणून संबोधले.
व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये बसीत यांनी पाकिस्तानच्या रणनीतीतील गंभीर चूक उघड केली आहे. अमेरिका सारख्या दूरस्थ शत्रूंवर थेट हल्ला करणे शक्य नसल्याने भारतावर हल्ला करण्याकडे वळण्याची मानसिकता त्यांनी व्यक्त केली. आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य असेल? भारत, असे ते म्हणाले.
advertisement
त्यांनी पुढे असेही सुचवले की, पाकिस्तान थेट शत्रूंना लक्ष्य करू शकत नसला तरी भारतातील महानगरांवर हल्ला करण्याचा पर्याय सोडू नये. यामुळे भारतीय नागरिकांना कोलॅटरल टार्गेट म्हणून पाहिले जात असल्याचे संकेत मिळतात. मुंबई आणि नवी दिल्लीसारख्या शहरांचा उल्लेख करून त्यांनी 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांच्या आठवणीही पुन्हा जागृत केल्या.
वरिष्ठ गुप्तचर सूत्रांच्या मते, बसीत यांची ही विधाने अचानक केलेली नसून ती पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेकडून तयार केलेल्या (tutored) कथनाचा भाग असू शकतात. माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी म्हणून त्यांना लष्कराच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा आवाज मानले जाते. भारतामध्ये कुठेही लोकांना लक्ष्य करा अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य पाकिस्तानमधील दीर्घकालीन जिहादी विचारसरणीशी जुळते, जी भारताच्या सार्वभौमत्वाला सातत्याने आव्हान देत आली आहे. एकेकाळी द्विपक्षीय शांतता प्रक्रियेसाठी जबाबदार असलेला राजदूत आज भारतीय शहरांना लक्ष्य करण्याची भाषा वापरत असल्याने पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रात वाढलेल्या कट्टरतेचे चित्र समोर येते.
advertisement
#BreakingNews | "India may face 26/11-style attacks."
Former Pak High Commissioner Abdul Basit warns of a catastrophic security blowback for India if the US and Israel ever plan to strike Pakistan and its nuclear facility#ExclusiveStory: @manojkumargupta @AmanKayamHai_ and… pic.twitter.com/rQIZOxPoDD
— News18 (@CNNnews18) March 21, 2026
advertisement
बसीत यांनी भारताला एकमेव पर्याय म्हणून मांडल्याने एक धोकादायक आणि निराशाजनक लष्करी धोरण उघड झाले आहे. त्यांच्या मते जर अमेरिका किंवा इस्रायलने पाकिस्तानवर हल्ला केला, तर भारतावर हल्ला करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. भारताला पाश्चिमात्य लष्करी कारवायांशी जोडण्याचा हा प्रयत्न दक्षिण आशियातील संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मानला जात आहे. जगाने मान्य केले पाहिजे की पाकिस्तानने भारताकडे पाहू नये, असे म्हणत त्यांनी उलट आंतरराष्ट्रीय समुदायाला असा संदेश दिला की कोणत्याही संकटात पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया भारताशी तणाव वाढवण्याचीच असते.
advertisement
भारतीय गुप्तचर संस्थांसाठी ही विधाने सध्याच्या हायब्रिड थ्रेट वातावरणाची झलक देतात. बसीत यांसारख्या सुशिक्षित आणि उच्चपदस्थ व्यक्तींमार्फत अशा हिंसक विचारसरणीचे सामान्यीकरण केले जात असल्याने, सार्वजनिक मत तयार करण्याचा आणि जागतिक स्तरावर संदेश देण्याचा एक समन्वित प्रयत्न असल्याचे मानले जाते.
भारतावर हल्ला करण्याचा पर्याय कधीही सोडू नये, या त्यांच्या विधानातून भारत हा पाकिस्तानच्या भू-राजकीय तक्रारींचा कायम केंद्रबिंदू राहणार असल्याचे स्पष्ट होते. सूत्रांच्या मते माजी राजदूताकडून आलेले हे धक्कादायक विधान दाखवते की पाकिस्तानमधील जिहादी विचारसरणी केवळ टोकाच्या गटांपुरती मर्यादित नसून ती राजनैतिक आणि लष्करी स्तरावरही खोलवर रुजलेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 8:47 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Exclusive: मुंबई-दिल्लीवर हल्ले करा, इस्रायलच्या भीतीने भारताला 'डीफॉल्ट टार्गेट' करण्याचा प्लॅन, पाकिस्तानने ओकली विषारी गरळ









