Republic of Balochistan: स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा; पाकिस्तानचे दोन तुकडे? भारताकडे केली मोठी मागणी, UNची तातडीची बैठक होणार!

Last Updated:

Balochistan News: बलुचिस्तानच्या राष्ट्रवादी नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली आहे. या Symbolic हालचालीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रदेशाच्या भविष्यावर आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

News18
News18
क्वेट्टा: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील राष्ट्रवादी नेत्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचलले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. कारण या नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली आहे. मीर यार बलोच यांसारख्या प्रमुख नेत्यांनी या प्रतीकात्मक हालचालीचे नेतृत्व केले आहे. ज्यामुळे बलुचिस्तानच्या दीर्घकाळ चाललेल्या तक्रारी, त्याचे धोरणात्मक महत्त्व आणि भारत सरकारकडे केलेली मदत आणि दूतावासाची मागणी यावर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषतः नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे.
बलोच प्रसिद्ध लेखक आणि बलुच हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते मीर यार यांनी X वर अनेक पोस्ट्सद्वारे ही घोषणा केली. त्यांनी भारत सरकारला नवी दिल्ली येथे बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय म्हणजेच दूतावास उघडण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानी सैन्याला या प्रदेशातून माघार घेण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
9 मे रोजी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, दहशतवादी पाकिस्तानचा पाडाव लवकरच होणार आहे. त्यामुळे लवकरच एक मोठी घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दावा केला आहे आणि आमची भारताला विनंती आहे की त्यांनी दिल्लीत बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्यास परवानगी द्यावी.
याव्यतिरिक्त त्यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि UN च्या सदस्य राष्ट्रांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. आम्ही संयुक्त राष्ट्रांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि सर्व UN सदस्यांची बैठक बोलावून पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी डॉलर्सची मदत जारी केली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
याच वेळी, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानचा नकाशा आणि त्याचे ध्वज फडकवणाऱ्या लोकांचे फोटो प्रसारित केले.
ऑपरेशन हेरोफ
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने अलीकडेच 'ऑपरेशन हेरोफ' अंतर्गत 51 ठिकाणी पाकिस्तानी राजवटीविरुद्ध 71 समन्वित हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. BLA ने सांगितले की त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थांचे तळ, स्थानिक पोलीस स्टेशन्स, खनिज वाहतूक वाहने आणि प्रमुख महामार्गांवरची पायाभूत सुविधांना लक्ष्य केले.
advertisement
11 मे रोजी जारी केलेल्या एका निवेदनात, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने दक्षिण आशियात एक नवीन व्यवस्था अपरिहार्य झाली आहे असे घोषित केले. पाकिस्तानचे वाढते लष्करी अपयश, राजनैतिक एकाकीपण आणि धार्मिक दहशतवादाचा वापर यामुळे या प्रदेशाच्या सुरक्षा चौकटीत अपरिवर्तनीय तडे गेले आहेत, असा दावा त्यांनी केला.
बलुचिस्तानमधून आली मोठी बातमी, BLAने केली पाकिस्तानच्या प्याद्याची शिकार
BLA ने बलुच प्रतिकार हा कोणीतरी घडवून आणलेला संघर्ष आहे हे मत फेटाळले आणि आपली स्वतंत्र ओळख गतिशील आणि निर्णायक पक्ष म्हणून स्थापित केली. ज्याची प्रदेशाच्या लष्करी, राजकीय आणि धोरणात्मक परिवर्तनात वैध भूमिका आहे. BLA ना प्यादे आहे ना मूक दर्शक, असे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानला दहशतवाद निर्यात करणारे राष्ट्र म्हणून नष्ट केल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
पाकिस्तानला असे राष्ट्र ज्याचे हात रक्ताने माखलेले आहेत आणि ज्याचे प्रत्येक वचन रक्तात भिजलेले आहे असे संबोधून, या संघटनेने इस्लामाबादच्या अलीकडील युद्धबंदी आणि संवादाच्या हाकांना "धोका आणि युद्धनीती" म्हणून नाकारले. त्यांनी भारत आणि इतर प्रादेशिक शक्तींना पाकिस्तानसोबत शांततेच्या भ्रमात राहणे थांबवण्याचे आवाहन केले आणि पाकिस्तानच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची वेळ आता निघून गेली आहे, असे ठाम मत व्यक्त केले.
advertisement
पाकिस्तानात समावेशापासून ते बंडखोरीपर्यंत
बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध प्रांत आहे. ज्याचा इतिहास संघर्षाने आणि बंडखोरीने भरलेला आहे. मूळतः कलातच्या राजेशाही राज्याचा भाग असलेले बलुचिस्तान 1948 मध्ये वादग्रस्त परिस्थितीत पाकिस्तानने जोडले. यामुळे पहिली बंडखोरी झाली. ज्यात बलुच राष्ट्रवाद्यांनी त्यांच्या मते जबरदस्तीने केलेले एकत्रीकरण आणि त्यांच्या स्वायत्ततेचे उल्लंघन याविरुद्ध निषेध नोंदवला. त्यानंतरच्या दशकांमध्ये अनेक उठाव झाले. ज्यांना लष्करी दडपशाहीचा सामना करावा लागला, ज्यामुळे असंतोष आणि दडपशाहीचे चक्र सुरू झाले.
advertisement
इस्लामाबादविरुद्ध...
सक्तीने बेपत्ता करणे, न्यायालयीन प्रक्रियेबाहेर हत्या करणे आणि लष्करी कारवाईच्या वृत्तांमुळे स्थानिक लोक अधिक दुरावले गेले. अलीकडेच प्रसिद्ध बलुच कार रेसर तारिक बलोच यांची कथितपणे पाकिस्तानच्या "किल अँड डंप" धोरणांतर्गत हत्या हे या प्रदेशातील मानवाधिकार चिंतेचे उदाहरण आहे.
धोरणात्मक महत्त्व: ग्वादर बंदर आणि CPEC
बलुचिस्तानचे भू-राजकीय महत्त्व ग्वादर बंदरामुळे अधिक अधोरेखित होते. जे चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) चा एक महत्त्वाचा भाग आहे. चीन आणि मध्य पूर्वेकडील देशांदरम्यान व्यापारासाठी प्रवेशद्वार म्हणून या बंदराची निर्मिती करण्यात आली आहे आणि यात चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. तथापि स्थानिकांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पांचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ज्यामुळे पुरेसे नुकसानभरपाई न देता त्यांचे विस्थापन आणि पर्यावरणाची हानी होत आहे. हे बंदर बलुच बंडखोरांच्या चीनच्या नागरिकांवरील हल्ल्यांचे केंद्र बनले आहे. जे इस्लामाबाद आणि बीजिंग दोघांबद्दलचा खोलवरचा असंतोष दर्शवते.
भारताकडे मदतीची मागणी
एका महत्त्वपूर्ण घडामोडीत बलुच नेत्यांनी भारताकडे मदतीची आणि मान्यता मिळवण्याची प्रतीकात्मक हलचाली केल्या आहेत. मीर यार बलोच यांनी ऐतिहासिक जिना हाऊसचे नाव बदलून "बलुचिस्तान हाऊस" करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होऊ शकतील. सोशल मीडिया मोहिमेत बलुच कार्यकर्त्यांनी भारतासोबत एकजूटता दर्शवली आहे.
धोक्यात काय 
बलुच नेत्यांनी केलेली स्वातंत्र्याची घोषणा जरी ती मोठ्या प्रमाणात प्रतीकात्मक असली तरी, त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम आहेत. हे पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देते आणि देशातील इतर फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देऊ शकते. भारतासाठी बलुचिस्तानसोबत वाढलेला संपर्क काश्मीरमधील पाकिस्तानच्या कारवायांना एक धोरणात्मक प्रतिभार म्हणून काम करू शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Republic of Balochistan: स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा; पाकिस्तानचे दोन तुकडे? भारताकडे केली मोठी मागणी, UNची तातडीची बैठक होणार!
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement