डायनॉसरसारखेच पृथ्वीवरून माणसंही नष्ट होणार? कुणा भविष्यवक्ताने नाही NASA च्या सुपरकॉम्प्युटरची भविष्यवाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Earth Life End : एका सुपरकॉम्प्युटरने पृथ्वीवरील जीवनाच्या अंताची भविष्यवाणी केली आहे. सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने, शास्त्रज्ञांच्या एका पथकाने पृथ्वीवरील जीवन कधी आणि कसे संपेल हे शोधून काढलं आहे.
नवी दिल्ली : पृथ्वीचा किंवा पृथ्वीवरील जीव एक ना एक दिवस नष्ट होणार, याबाबत बरेच दावे केले जातात. काही वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाल्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यामध्ये सर्वात जास्त मानला जाणारा सिद्धांत म्हणजे या प्राण्याचे अस्तित्व एक महाकाय उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यानंतरच संपलं. आता नासाच्या सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने पृथ्वीवरील जीवन कधी आणि कसं संपेल हे शोधून काढलं आहे. त्यानुसार डायनासोरच्या विपरीत मानवांच्या नामशेष होण्याचं कारण लघुग्रह किंवा उल्कापिंड असणार नाही.
शास्त्रज्ञांच्या एका पथकाने सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने पृथ्वीवरील जीवन कसं संपेल याचा अंदाज वर्तवला आहे. हा अभ्यास 2021 मध्ये काझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर टी. रेनहार्ड यांनी नेचर जिओसायन्स रिसर्चमध्ये प्रकाशित केला आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे आपला ग्रह हळूहळू राहण्यायोग्य होणार नाही. पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची पातळी अखेर संपेल आणि कोणीही जगणार नाही, असं या संशोधनात म्हटलं आहे.
advertisement
संशोधकांच्या मते, पृथ्वीचं सध्याचं वातावरण बहुतेक ऑक्सिजनयुक्त आहे, परंतु पृथ्वीच्या वातावरणातील ऑक्सिजन-आधारित बायोसिग्नेचरचे वय निश्चित केलेलं नाही. एका प्रयोगात, त्याने पृथ्वीच्या ऑक्सिजन समृद्ध वातावरणाचा कालखंड शोधला. नासा आणि जपानच्या तोहो विद्यापीठातील सदस्यांचा समावेश असलेल्या या पथकाने असा निष्कर्ष काढला की कोणत्याही वातावरणात नेहमीच पुरेसा ऑक्सिजन असू शकत नाही. हा निष्कर्ष भयावह होता.
advertisement
ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका सिम्युलेशनद्वारे भविष्यात आपल्या ग्रहाची स्थिती भाकीत केली. त्यांच्या मते, येणाऱ्या काळात जागतिक तापमान मोठ्या प्रमाणात वाढेल. यामुळे खंड पुन्हा एकत्र येतील आणि एक नवीन महाखंड तयार होईल, ज्याला पँजिया अल्टिमा म्हणतात. पँजिया अल्टिमाच्या काळात, पृथ्वी खूप उष्ण आणि कोरडी असेल आणि ज्वालामुखीचा उद्रेक अधिक वारंवार होईल.
advertisement
या उष्णतेमुळे, मानव आणि सस्तन प्राण्यांसह अनेक प्रजाती मोठ्या संख्येने नामशेष होतील. कडक सूर्य आणि वातावरणात कार्बन डायऑक्साइड इतका जास्त असेल की अन्न आणि पाणी शिल्लक राहणार नाही. घाम येऊनही शरीरातील उष्णता कमी होणार नाही आणि शरीर थंड राहू शकणार नाही.
advertisement
दिलासा देणारी बाब म्हणजे ही परिस्थिती येण्यासाठी लाखो वर्षे लागतील आणि गणनेनुसार, पृथ्वीवरील जीवन 1000002021 मध्ये संपुष्टात येऊ शकतं.
Location :
Delhi
First Published :
May 14, 2025 4:39 PM IST
मराठी बातम्या/Viral/
डायनॉसरसारखेच पृथ्वीवरून माणसंही नष्ट होणार? कुणा भविष्यवक्ताने नाही NASA च्या सुपरकॉम्प्युटरची भविष्यवाणी