शरद राठोड यांनी सांगितले की, टिक्का हा रोग दोन प्रकारच्या बुरशीमुळे होतो. एक अर्ली टिक्का आणि दुसरा लेटर टिक्का. या रोगामध्ये पानांवर गोलसर तपकिरी किंवा काळसर डाग पडतात. यामुळे पानांची झपाट्याने गळती होते आणि झाड योग्य प्रकारे वाढत नाही. हे रोग झाडावर लवकर पसरतात आणि शेवटी दाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
advertisement
Farmer Success Story: शेतकऱ्याची कमाल, केळीपासून बनवले युनिक प्रॉडक्ट, कमाई 50 लाख!
या रोगापासून बचाव करण्यासाठी राठोड यांनी शेतकऱ्यांना काही उपाय सांगितले. त्यांनी म्हटले की, रोगप्रतिकारक जात वापरणे, JL 24, TAG 24 यांचा उपयोग करावा. त्याचबरोबर शेतात पिकांचे फेरपालट करावा. म्हणजे दरवर्षी एकाच जागी भुईमुगाचे पीक टाळावे. रोगट झाडांचे अवशेष जाळून नष्ट करावेत जेणेकरून पुढच्या हंगामात रोग पसरू नये.
रासायनिक फवारणीबाबत त्यांनी सांगितले की, मँकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ही फवारणी रोग दिसताच करावी आणि त्यानंतर दर 10-12 दिवसांनी किमान दोन वेळा करावी. फवारणी करताना पाऊस नसावा आणि हवामान कोरडे असावे. यामुळे फवारणीचा चांगला परिणाम होतो.
शेवटी शरद राठोड यांनी असेही सांगितले की, नैसर्गिक उपाय देखील उपयोगी ठरतात. ट्रायकोडर्मा, निम अर्क किंवा लसूण-गूळ काढा यांची फवारणी केल्यास रोगावर आळा बसतो. शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्यास टिक्का रोगाचा धोका कमी करता येतो आणि भुईमुगाचे चांगले उत्पादन घेता येते.





