TRENDING:

काय आहेत बिष्णोई समाजाचे 29 नियम? यामुळे सलमानचं टेंशन वाढणार की कमी होणार?

Last Updated:

Salman Khan news in Marathi: सलमान खान लॉरेन्स बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर तर सलमानच्या सुरक्षेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सलमान खान लॉरेन्स बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर तर सलमानच्या सुरक्षेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सलमानला Y प्लस सुरक्षा सरकारने दिली. सलमानने माफी मागितली तर बिष्णोई समाज त्याला 29 नियमांनुसार माफ करेल असं अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.
काय आहेत बिष्णोई समाजाचे 29 नियम?
काय आहेत बिष्णोई समाजाचे 29 नियम?
advertisement

जर सलमान खानने माफी मागितली तर बिष्णोई समाज त्याला माफ करेल, पण यासाठी सलमानने स्वतः येऊन चूक कबूल करून माफी मागावी. यानंतर बिष्णोई समाजातील न्यायनिवाडा करणारे एकत्र बसतील आणि 29 नियमांनुसार माफ करतील, असं देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.

सलमान खानला दिली Y+ सेक्युरिटी, भाईजानच्या सुरक्षेसाठी सरकार किती पैसे खर्च करणार?

advertisement

‘बिष्णोई समाजाच्या 29 नियमांमधल्या 10 व्या नियमात चुकीला माफ करण्याचं प्रावधान आहे. आमचे धर्मगुरू जंभेश्वर यांनी 29 नियम बनवले आहेत. जर कुणी अपराध केला असेल आणि त्याने याबद्दल माफी मागितली तर त्याला माफ केलं जाऊ शकतं, हे प्रावधान नियमांमध्ये आहे. बिष्णोई समाज कधीच कुणाचं नुकसान करत नाही, जर कुणी क्षमेच्या भावनेने येत असेल तर समाजातले प्रतिष्ठित लोक बसून त्या व्यक्तीला माफ करतात’, असं देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.

advertisement

काय आहेत बिष्णोई समाजाचे 29 नियम?

बिष्णोई समाजाच्या 29 नियमांचं पालन समाजात शांती, निसर्ग प्रेम आणि धार्मिक अनुशासन ठेवण्यासाठी केलं जातं.

सकाळी स्नान करून पावित्र्य राखावं

नम्रता, समाधान आणि पावित्र्य पाळणं

सकाळ-संध्याकाळ संध्या आणि प्रार्थना करणं

संध्याकाळी आरती करणं आणि भगवान विष्णूची प्रार्थना करणं

सकाळी हवन करणं

पाणी गाळून पिणे आणि वाणी शुद्ध ठेवणे

advertisement

इंधन आणि दूध गाळून वापरणे

क्षमा आणि सहनशीलतेचं पालन करणे

दया आणि नम्रतेने आयुष्य जगणे

चोरी करू नये

कुणाचीही निंदा करू नये

खोटं बोलू नये

वादापासून लांब राहावं

अमावस्येला व्रत ठेवणं

विष्णूचं भजन करणे

सर्व प्राण्यांवर दया करणे

वृक्षतोड करू नये

स्वतःच्या हाताने जेवण बनवणे

बैलाला नपुंसक न करणे

अंमली पदार्थ, तंबाखू, भांग आणि दारूचं सेवन न करणे

advertisement

मांसाचं सेवन न करणे

निळ्या रंगाचे कपडे न घालणे

दरम्यान, 1998 साली “हम साथ साथ है” च्या शूटिंगवेळी सलमान खानसह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे, पण या घटनेमुळे बिष्णोई समाज सलमान खानविरोधात आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
काय आहेत बिष्णोई समाजाचे 29 नियम? यामुळे सलमानचं टेंशन वाढणार की कमी होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल