सातारा: क्षयरोग अर्थात टीबी हे नुसते नाव ऐकले तरी आजही मनात धडकी भरते. याला कारणही तसेच आहे. क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. क्षयरोग उपचार करण्यायोग्य आहे. तरी देखील योग्य काळजी न घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
क्षयरोग सर्वांनाच होत नाही. कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. या रोगामुळे मृत्यूच्या प्रमाणाचा विचार केला तर एड्सनंतर याचे सर्वात घातक इन्फेक्शन मानले जात होते. पण आता काळाच्या ओघात वेळीच निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकते हे सिध्द झाले आहे.
ही उपचार पद्धती ठरतेय कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान, डॉक्टरांनी सांगितली सविस्तर माहिती, Video
टीबी म्हणजेच क्षयरोगाची लक्षणं काय?
एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, दरम्यान वजन कमी होणे, भूक कमी होणे, रात्रीच्या वेळी बारीक ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे असे आढळून आल्यास त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. यामध्ये हाडे सांध्याचा क्षयरोग, लसिका ग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग आदी प्रकार असतात. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मध्येच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते, असं डॉक्टर सांगतात.
रोगाचे निदान अन् उपचारपध्दती
दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस खोकला असणा-या व्यक्तीची थुंकी तपासून या आजाराचे निदान करता येते. काही रुग्णांमध्ये ‘क्ष’ किरण तपासणी व इतर अधुनिक चाचण्यांद्वारे देखील तपासणी करता येते. मात्र, थुंकी तपासणी ही सोपी, सरळ, स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारी पध्दती आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बीबीजी लसीकरण देखील करता येते. त्यासाठी IP ही दोन महिन्याची उपचार पद्धती आहे. तर CP ही चार महिन्याची उपचार पद्धती आहे.
कडधान्य, पालेभाज्या बनवताना कांदा आणि आल्याचा वापर टाळताय? मग आधी हे वाचाच
क्षयरोग जोखमीचा वयोगट
रोग प्रतिकारशक्ती कमी असणारी व्यक्ती उदाहरणार्थ HIV बाधित रुग्ण, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह असणारे व्यक्ती, गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, लहान मुले हा क्षयरोगाबाबत जोखमीचा वयोगट आहे.
क्षयरोग पसरतो कसा?
क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. खोकल्यातून किंवा शिंकण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत याचा प्रसार होतो. धूम्रपान करणाऱ्यांना, मधुमेह किंवा एचआयव्ही, एड्सबाधितांना सक्रिय टीबी होतो. सर्वाधिक धोका मधुमेही, एचआयव्हीबाधितांना क्षयरोग रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या मधुमेह, एचआयव्हीबाधितांसह कुपोषितांना, स्टेरॉईड्स घेणाऱ्यांना, दारूचे व्यसन असणाऱ्यांना या रोगाचा धोका जास्त असतो. वैद्यकीय विद्यार्थी तसेच परिचारिका आणि डॉक्टरांनाही याचा धोका संभवतो, असे डॉक्टर सांगतात.
पोहे खाल्ल्यावर जळजळ होतेय? मग खाण्याची पद्धत चुकतेय, पाहा काय घ्यावी काळजी? Video
क्षयरोग उपचारासाठी योजना
क्षयरोग उपचारासाठी निक्षय पोषक योजना आणि निक्षय मित्र योजना आहेत. निक्षय पोषक योजनेमुळे क्षयरोग (टिबी ) बाधित रुग्णाला प्रत्येक महिना 500 रुपये बँक खात्यावर जमा होतात. निक्षय मित्र याच्या माध्यमातून हे समाजातील दानशूर व्यक्ती जे लोकांना मदत करण्याची इच्छा असेल ते क्षयग्रस्त व्यक्तींना दत्तक घेऊन त्यांचं पोषण आहार किंवा मदत म्हणून धान्य, फळे या स्वरूपात देखील मदत करत असतात.