पावसाळ्यात डेंग्यू आजार टाळण्यासाठी घरात साचलेले पाण्याचे लार्वा सर्वप्रथम काढणे आवश्यक आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी 24 तास गुडनाईट मशीनचा वापर करावा, मच्छरदाणी लावून झोपले पाहिजे. काही वेळा डेंग्यू गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. डेंग्यू हा तीन प्रकारांमध्ये मोडतो. एक लहान मुलांना ताप येणे, अंगावर लालसर चट्टे येणे, हात, पाय, डोकं दुखणे आणि झोपाळूपणा येणे. दुसरा प्रकार म्हणजे पेशी कमी होणे, प्लेटलेट्सही कमी होऊ शकतात. तसेच शरीरातील पाणी कमी होणे अशा बाबी प्रामुख्याने घडतात. तसेच असे प्रमुख लक्षणे दिसतात.
advertisement
Health Tips : जांभूळ खाऊन बिया फेकून देता? तुम्ही करताय मोठी चूक, हे फायदे एकदा वाचाच
छत्रपती संभाजीनगरमध्ये या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये डेंग्यू सुरू झाला नाही मात्र नेहमी या दिवसांत अनुभवानुसार डेंग्यूचे खूप सारे रुग्ण येत असतात असे देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डेंग्यूचे डास चावतात त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. शाळेत मुलांना फुलपँट घालणे, बूट घालणे आणि शाळेच्या परिसरात देखील छतावर साचलेले पाणी काढले पाहिजे, कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे या बाबींची शिक्षकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे.